मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
• बहूगुणी जिरा... • दैनंदिन जीवनातील उपयोग... संकलन-संपादन अभय संजयराव पाठक       बदलत्या जीवनशैली मुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका संभवतो. कोलेस्टेरॉल वाढल्याने ह्रदय विकार उद्भवू शकतात. जिरे दररोज सातत्याने सेवन केले तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.       वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक डाएट केले जातात. जिरे गरम पाण्यात उकळून त्याचे दररोज सकाळी अनाशापोटी सेवन केले तर वजन कमी होते असे सिद्ध झाले आहे.        मुळव्याधीवरही जिरे हा रामबाण उपाय आहे. जिरे, सैंधव मीठ आणि ताक एकत्र करून पिल्यास मुळव्याधीपासून आराम मिळतो.        सांधेदुखी चा त्रास हा अत्यंत त्रासदायक असतो. सांधेदुखीवरही जिरे इलाज करू शकतात. जिरे, मेथ्या, ओवा, बडीशेप इत्यादि घटकांना बारीक वाटून हे चूर्ण दररोज खाल्ले तर सांधेदुखी वर आराम मिळतो.        बदधकोष्ठतेमुळे बैचेन झाल्यासारखे होते व यावर मात्रा म्हणून ताक, सैंधव मीठ आणि जिरे पावडर एकत्र करुन त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.        उलटी...
•    डॉ. तरंगतुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आवाहन •  देशभक्तीचा नारा ! प्रत्येकाने पाच नागरिकांना व्यसन मुक्त करा  अकोला :  आज दि ३१/५/२५ रोजी अकोला येथे जिल्हाधिकारी अजित कुंभार ,  अर्चीत चांडक जिल्हा पोलिस अधीक्षक , डॉ तरंगतुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय ,डॉ संतोष सोमाणी आय एम ए अध्यक्ष डॉ सोनल मोदी      मुक्ती फाउंडेशन अध्यक्ष, डॉ विनोद करंजीकर माता बाल संगोपन अधिकारी,डाँ आशिष गिर्हे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अकोला डॉ प्रिती कोगदे तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ,डॉ प्रदीप अग्रवाल, डॉ गोविंद खंडेलवाल ,डॉ मयूर अग्रवाल यांचे सहभागात जागतीक तंबाखू विरोधी दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला .        तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजार होत आहेत याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यात तरून तरुणी सक्रिय होत आहेत हि फार गंभीर बाब आहे तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर परिणाम व त्यापासून दूर राहाण्यासाठी जनजागृती म्हणून आज अजित कुंभार जिल्हाधिकारी यांचे हस्ते उदघाटन करुन अकोला शह...
विद्यार्थ्यांनी वाचन- संस्कृतीवर भर देवून मोबाईलचा कामापूरताच वापर करावा                 - शिक्षणतज्ञ गजानन नारे यांचे आग्रही  प्रतिपादन अकोला : आजच्या संगणक आणि धकाधकीच्या युगात मोबाईलचा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे. यद्यपि,  विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची दिशा वाचन संस्कृतीनेच प्रभावी स्वरूपात प्राप्त होवू शकते, असे आग्रही प्रतिपादन प्रभात किडस स्कुलचे संस्थापक गजानन नारे यांनी शैक्षणिक मार्गदर्शनात  केले .        शहरात एकत्रीत कुटुंब म्हणून ओळख असलेले  मांडेकरबंधू परिवारातर्फे आयोजित  पारिवारीक कौतूक सोहळा मध्ये  कु . मधुरा सोहळे BCA , चि . केदार मांडेकर  यांनी ८६% असे भरीव यश संपादन केल्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक प्रोत्साहनार्थ कार्यक्रमाचे आयोजन  जयहिंद चौकात  करण्यात आले होते .       यावेळी व्यासपिठावरून डॉ . गजानन नारे यांनी विद्यार्थीच्या प्रगती मध्ये  पारिवारीक प्रोत्साहन करीता मांडेकर परिवाराच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे कौतूक करीत विद्यार्थाना घरातील प्रो...
श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे  सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचा समारोप नव्या पिढीला संस्कार देण्यासाठी शिबिरासारखे उपक्रम महत्वपूर्ण – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर         अकोला : मोबाईल आणि नवमाध्यमांच्या या युगात नवी पिढी अध्ययन, जीवनमूल्ये व संस्कार यापासून दुरावता कामा नये. मुलांना ही शिकवण व संस्कार देण्यासाठी सर्वांगीण विकास शिबिरासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.       अकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचा समारोप पालकमंत्री श्री. फुंडकर यांच्या उपस्थितीत झाला. श्री क्षेत्र आळंदी (देवाची) येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या उपशाखेचे उद्घाटनही यावेळी झाले. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे, ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले, प्रकाश महाराज जवंजाळ, उपविभागीय अधिकारी मनोज लोणा...
शेगांव संस्थानसारखे शिस्तबद्ध, स्वच्छ, सुंदर, संस्थान जगात कुठेच नसेल ..              संकलन - संपादन :               - विजय द.केंदरकर         आपण शेगावला भक्त म्हणून जातो, तेथल्या नीट नेटकेपणा, स्वच्छता, एकंदरीत असलेली चोख व्यवस्था यांचे आपल्याला मनोमन कौतुक वाटते. त्यामागे काम करणाऱ्या यंत्रणे बद्दल....        अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा डोळ्यांचे पारणे फेडणारा एक नितांत सुंदर अनुभव ..!!         गेल्या तीन वर्षांपासून आपण, भक्तांकडून लाडूंसाठीचे साहित्य संकलित करुन, बरोब्बर गुरुपौर्णिमेच्याच दिवशी शेगांवी पोहचवून देत आहोत ..!! ह्या वर्षी तर विक्रमी संकलन झाले .. तब्बल १५ टन ..!!       हे साहित्य आपण प्रत्यक्ष कुठे जमा करतो, हे पाहण्याचा योग मला स्वतःला ह्या वर्षी,  म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आला ..!!       आपण नेहमी शेगांव येथे जात असतो .. मंदिरातील सर्व चोख व्यवस्था अनुभवित असतो .. मोठ्या श्रद्धेने महाप्रसाद ग्रहण कर...
•  अॕड. गजानन पुंडकर स्वागताध्यक्ष   •   शिवराज्याभिषेक दिनानिमित्त  आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार  अमरावती दि. 30 :   अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते  अॕड. गजानन पुंडकर  यांची यावर्षीच्या राज्यस्तरीय आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार समारोहाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. हा सत्कार समारंभ येत्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या शेगाव नाका चौकातील अभियंता भवन मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी  व युवा संवाद प्रतिष्ठान यांच्या वतीने संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती मधील सर्व सनदी अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असून यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आय ए एस ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दहा विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्याबरोबर त्यांच्या आई वडिलांचाही सत्कार या कार्यक्रमात संपन्न होणार आहे. आपल्या विदर्भात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविण्य...
  लातूर नांदेड पॅटर्न गडचिरोलीत राबविणारे आयएएस अधिकारी आता अमरावतीत: जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर                              लेखक :            प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे                     संचालक, मिशन आयएएस                            अमरावती कॅम्प                     संवाद : 9890967003            आय ए एस अधिकारी श्री  आशिष येरेकर बोलत होते. मी ऐकत होतो. माझ्याबरोबरच माझे सर्व विद्यार्थी करिअर कट्टा या  उपक्रमात  सहभागी झाले होते. त्या दिवसचे  वक्ते होते श्री आशिष येरेकर. तेव्हा ते गडचिरोली जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी व आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची एक एक गोष्ट  जितने वाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग ढंग से...
  •  तंबाखूला करा बाय बाय ! •  31 में जागतिक तंबाखूविरोध दिवस                              लेखक                     डॉ. संदीप चव्हाण                       होमियोपॕथिक तज्ञ                     संवाद : 9518704840  सर्वत्र तंबाखू सेवन आणि त्याचे दुष्परिणाम यावर जनजागृती केली जाते. त्यानिमित्त आपण देखील त्याबद्दल थोडे सजग होऊया. तंबाखू आणि गुटखा आपल्या शरीराला तर हानी पोहोचवतातच परंतु गुटखा, तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान यांचा शरीराच्या प्रत्येक अवयवावर देखील परिणाम होतो. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.  देशाच्या लोकसंख्येच्या 28.6 टक्के म्हणजेच प्रत्येक 5 पैकी 1 धूरविरहित तंबाखूचे सेवन करते. तर दर 10 पैकी 1 व्यक्ती धूम्रपान करतो. तंबाखूचे सेवन करणाय्रांपैकी ५० टक्के लोकांचा यामुळे मृत्यू होतो. तंबाखू खरेदी करताना त्याच्या पाकिटावरही तंबाखू न खाण...
संदीप पाटील बाळापूर कृऊबास  बांधकाम समिती सभापतीपदी            बाळापूर : बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकाम समिती सभापतीपदी संदीप दादाराव पाटील यांची अविरोध निवड झाली आहे. बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत संस्थेचे सभापती सेवकराम ताथोड यांनी संदीप पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.  त्यास उपसभापती राजेश राऊत यांनी अनुमोदन दिले.          नियुक्ती सभेला सहाय्यक निबंधक श्रीमती आर. आर. विटणकर, सहकारी अधिकारी गोपनारायण यांच्यासह संचालक सर्वश्री रामभाऊ काळे, रमेश ठाकरे, कैलास घोंगे, रवींद्र सरप, रामेश्वर पोहरे, गव्हाणकर, नितीन रवींद्र मुरूमकर, ज्ञानेश्वर माळी, गुलाम-नफीस गुलाम नबी, गजानन वजिरे, लक्ष्मण सरप, राजेश्वर वैराळे, धनंजय दांदळे, अनिता भागवत माळी, रेखा संजय कराळे प्रामुख्याने हजर होते.          सभेचे संचालन सचिव के. एस. नावकार यांनी केले. संदीप पाटील यांच्या निवडीमुळे शेतकऱ्यांमध्ये व सभासदांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
  •    अमरावती येथे  आयएएस  विद्यार्थ्यांचा सत्कार  •  प्राचार्य डॉ. कमलताई गवई ह्या उपस्थितीत          (प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे) अमरावती : यंदाच्या निकालात आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येत्या 6 जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या  शेगाव नाका चौकातील अभियंता भवनात आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. लेडी गव्हर्नर व सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी विराजमान झालेले श्री भूषण गवई यांच्या मातोश्री प्राचार्य डॉ. कमलताई गवई ह्या उपस्थित राहणार आहेत.            या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल पोलीस महानिरीक्षक श्री रामदास पोकळे,  जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजीता महापात्रा, तसेच अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद व मुद्रांक जिल्हाधिकारी श्री अ...
  •  विकासकामे गुणवत्ता राखून  वेळेत पूर्ण करा  – खासदार अनुप धोत्रे •  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक  अकोला, दि २८: केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यात रस्ते, स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. विविध विकासकामांचे नियोजन करून सर्व कामे गुणवत्तापूर्ण व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे दिले.  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार श्री. धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्जित चांडक,जि प मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोज जाधव महापालिका आयुक्त सुनील लहाने आदी उपस्थित होते. खासदार धोत्रे म्हणाले की, पायाभूत सुविधा, आवास योजना व सामान्य माणसाचे जीवनमान सुकर करण्यासाठी अनेकविध योजना केंद्र शासनातर्फे राबवल्या जातात. त्यांची परिपूर्ण अंमलबजावणी व्हावी. कामे कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्ठा उपलब...
नाना पाटेकर स्वतःच "स्वच्छ नाना"चा सत्कार करतो तेंव्हा... (राजा माने यांजकडून) पुणे, दि 27 - मकरंद अनासपुरे यांच्या संगतीने "नाम फाउंडेशन" च्या माध्यमातून देशापुढे जलसंवर्धन आणि ग्रामविकासाचा आदर्श ठेवणारा आणि बॉलीवूडमध्ये "नाना"नावाचा मराठी दबदबा निर्माण करणारा नाना पाटेकर! हाच नाना आपला मान समाजसेवा आणि प्रशासकीय सेवेत इतिहास घडवित असलेल्या दुसऱ्या "स्वच्छ नाना"ला देवून त्याचा सन्मान करतो आणि टाळ्यांच्या कडकडाटाने बालगंधर्व रंगमंदिर दुमदुमून जाते! हा सभागृह भारावून टाकणारा प्रसंग परवा पुण्यात घडला. महाराष्ट्रापुढे एक समाजसेवेचा नवा पॅटर्न ठरलेल्या बार्शी तालुका कृषी पदवीधर संघटना आणि मातृभूमी प्रतिष्ठान सारख्या संस्था उभारण्याची संकल्पना मांडून ती साकार करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे "स्वच्छ नाना".. सुपर क्लास वन अधिकारी.. गेल्या २५ वर्षांत लातूर,सांगली पासून मुंबईपर्यंतची सर्वोच्च "मालदार पदे", अनेक वर्षे अनेक कॅबिनेट मंत्र्याचे खाजगी सचिव राहिलेले आणि सध्या कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाजगी सचिवपद उपभोगत असलेले म...