मुख्य सामग्रीवर वगळा



शेगांव संस्थानसारखे शिस्तबद्ध, स्वच्छ, सुंदर, संस्थान जगात कुठेच नसेल .. 
           संकलन - संपादन :
              - विजय द.केंदरकर


        आपण शेगावला भक्त म्हणून जातो, तेथल्या नीट नेटकेपणा, स्वच्छता, एकंदरीत असलेली चोख व्यवस्था यांचे आपल्याला मनोमन कौतुक वाटते. त्यामागे काम करणाऱ्या यंत्रणे बद्दल....
       अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा डोळ्यांचे पारणे फेडणारा एक नितांत सुंदर अनुभव ..!!
        गेल्या तीन वर्षांपासून आपण, भक्तांकडून लाडूंसाठीचे साहित्य संकलित करुन, बरोब्बर गुरुपौर्णिमेच्याच दिवशी शेगांवी पोहचवून देत आहोत ..!! ह्या वर्षी तर विक्रमी संकलन झाले .. तब्बल १५ टन ..!!



      हे साहित्य आपण प्रत्यक्ष कुठे जमा करतो, हे पाहण्याचा योग मला स्वतःला ह्या वर्षी,  म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आला ..!!
      आपण नेहमी शेगांव येथे जात असतो .. मंदिरातील सर्व चोख व्यवस्था अनुभवित असतो .. मोठ्या श्रद्धेने महाप्रसाद ग्रहण करीत असतो ..!! 'आनंद विहार', 'आनंद विसावा'त मुक्काम करीत असतो .. तिथल्या स्वच्छ परीट-घडीच्या चादरी, उशांचे अभ्रे, टाॅवेल्स् ह्यांचा वापर करीत असतो .. तेथील भोजनालयात आपण नाश्ता व भोजनाचा आनंद घेत असतो ..!! आणि इतकी नीट-नेटकी चोख व्यवस्था बघून अचंबित होत असतो ..!! 
     पण हे तर पाण्यात तरंगणा-या हिमनगाचे फक्त एक टोक आहे .. एक दशांश .. हे सर्व सुचारुपणे अव्याहत सुरु राहण्यासाठी या मागे एक फार मोठी, अवाढव्य यंत्रणा, समर्थ प्रेरणेने, चोवीस तास कार्यरत असते ..!! तो परिसर म्हणजे, अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा' ..!!



     शेगांव पासून तीन एक किलोमीटर अंतरावर, आकोट रोडवर ही अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा' आहे ..!!
       थक्क होतो आपण तो विस्तीर्ण परिसर पाहून,  अनुभवून ..!! काय नाही माऊली तिथे ..??
      वेगवेगळी डिपार्टमेन्टस् .. अगदी खाणीतून आणलेल्या मार्बल्स् च्या कटींग, कार्व्हिंग पासून हा परिसर सुरु होते .. तर लाकडी फर्निचर, वाहनांचे टायर्स, अभियांत्रिकी विभाग,  विद्युत विभाग, भाजी पाला भांडार, बटाटा कोल्ड स्टोअरेज, लाॅन्ड्री विभाग,  अजस्र धान्य भांडार .. आणि ह्या सर्वांंचा कळस म्हणजे अद्ययावत यंत्र व्यवस्थेने सुसज्ज अशी भली मोठ्ठी पाकशाळा ..!! कुठेही बाहेरील कोणालाही प्रवेश नाही ..!! स्वच्छतेची काळजी पराकोटीची ..!!


     लाडू तयार करण्याचा विभाग असो की धान्य भांडार .. कुठेही एकही मुंगी नाही की माशी नाही ..!! अगदी स्वच्छ .. स्वच्छता तर इतकी पराकोटीची, की सर्व इमारतींना बाहेरुन अग्नीशमन व्यवस्थेचे जे लाल लोखंडी पाईप असतात, त्यावर देखील धुळीचा एकही कण नाही ..!!  माऊली ..!! धन्य आहे ..!!*  

       व्यवस्थापन विभाग ...

    शेकडो सेवेकरी सतत कार्यरत .. पण कोणी कोणाशी टाईमपास करत, गप्पा मारतांना दिसत नाहीत .. की कोणाचा आपापसात बोलण्याचा आवाज नाही .. प्रत्येक सेवेकरी आपापल्या नियोजित कामात व्यस्त ..!!
       पाकशाळा तर इतकी अद्ययावत की, मोठाल्या स्टिम बाॅयलरवर काही मिनिटांत भात तयार होतो ..!! पोळ्यांचे देखील यंत्रच ..!! हाॅट ऑईल ने कढया गरम होऊन दहा पंधरा  मिनिटांत भाज्या शिजून तयार ..!!  इथेच मंदिर, आनंद विहार, आनंद विसावा येथील स्वयंपाक तयार होऊन पुरवठा केला जातो ..!! ती वाहने देखील एकदम स्वच्छ ..!!
      विशेष म्हणजे इथे सर्वसाधारणपणे कमीत कमी एक लाख भक्तांसाठी स्वयंपाक बनवला जातो ..!! गुरुवार असेल, रविवार असेल, गुरुपौर्णिमा असेल अशा विशेष दिवशी, दीड दोन ते अडीच लाख भक्तांसाठी स्वयंपाक तयार करण्यात येतो .. तो ही अगदी शांतपणे आणि शिस्तबद्ध पध्दतीने ..!! जय गजानन ..!!
महाराजच सर्व करवून घेतात माऊली ..!!
असो ...
       तिथेही सर्व सेवेकरी वर्गासाठी भोजनालय ..!! आम्हालाही तिथे भोजन घेण्याची विनंती करण्यात आली .. तिथे एक टेबल खुर्ची असलेला कक्ष होता .. तिथे आम्हाला बसविण्यात आले ..!! जागेवर पूर्ण भोजन वाढण्यात आले .. आमचे ताटही आम्हाला स्वहस्ते उचलू देण्यात आले नाही .. कारण, आम्ही त्यावेळी 'देणगीदार' ह्या कॅटॅगरीत होतो ..!! आपण भक्त आहोत महाराजांचे .. रांगेत राहून महा-प्रसाद घेण्याची सवय आहे आपल्याला ..!! त्या मुळे त्या क्षणी अवघडल्या सारखे झाले आम्हाला .. पण तेथील शिस्त आम्हीही मोडू शकत नव्हतो ..!!
    आमच्या ट्रक मधील साहित्य, एक एक करुन उतरविण्यात आले .. वजन करण्यात आले .. आणि शिस्तीत नियोजित जागी ठेवण्यात आले ..!!
असो ..
      तेथील भाज्यांचे गोदाम संपूर्णपणे वातानुकूलित ..!! आठ दिवस भाज्या खराब होणार नाहीत ..!!
       भक्तांच्या पोटात जाणा-या प्रत्येक साहित्याचा कण अन् कण बारकाईने तपासला जातो, चाळला जातो,  निवडला जातो ..!! मग ती साखर असो .. किंवा डाळ असो किंवा तांदूळ अथवा कडधान्ये ..!! अनेक सेवेकरी महिला हे काम सातत्याने आणि अत्यंत मन लावून करीत असतात ..!! ही व्यवस्था अगदी आवर्जून पाहण्यासारखी ..!!
      कणिक दळण्यासाठी एक महाकाय चक्की ..!! जवळून निरिक्षण करावी, तर आपल्या डोक्यावरील टोपी खाली पडेल ..!! हॅट्स ऑफ ..!!
       चक्कीत खूप उंचावरून पाईप द्वारे गहू खाली येतो .. त्याला जोडलेल्या, सतत हलणा-या महाकाय पांच सहा चाळणीतून जात असतो .. खाली त्याला तीन भली मोठी पोती .. एका पोत्यात शुध्द कणिक .. दोन  पोत्यात काडी-कचरा जमा होत राहातो .. आणि विशेष म्हणजे कुठेही पिठाचा एकही कण उडत नाही .. आश्चर्यच आहे ..!! अन्यथा चक्की म्हटली, तर कणिक तर इकडे तिकडे उडायलाच हवी ना माऊली ..!!
      लाॅन्ड्री विभाग ही इतका अजस्र, की डोळे अक्षरशः दिपून जातात .. मोठ-मोठाली वाॅशिंग मशीन्स्, ड्रायर्स्,  कपडे  वाळविण्याची उन्हाळी, पावसाळी वेग-वेगळी व्यवस्था, इस्त्रीचे मोठमोठे रोलर्स्, इकडून चुरगळलेली चादर किंवा पिलो कव्हर सरकविले, की खालून ते इस्त्री करुन बाहेर ..!! सेवेकरी मॅन्युअली घड्या करतात ..!! त्या देखील इतक्या व्यवस्थित, की एकही टोक घडीच्या बाहेर येणार नाही ..!!
      प्रत्येक वेग-वेगळ्या इमारतींच्या आजूबाजूला सुंदर हिरवेगार बगिचे, मोकळे मोठ-मोठे रस्ते .. पण कुठेही झाडाचे एकही वाळलेले, गळलेले पान नाही .. कोणी पाणीही टाकत नाही ..!! प्रत्येक झाडाच्या जवळून काळे पाईप्स्, ड्रिप सिस्टिम ..!! कुठल्याही झाडांत चिखल म्हणून नाही .. तरीही झाडे टवटवीत ..!! पाण्याची बचत ..!! आणि ड्रेनेज चे पाणी शुद्ध करुन झाडांना .. ते ही वाया जायला नको ..!!
       बघता बघता सायंकाळचे सहा वाजले .. दिवसभर न बोलता कार्यरत सर्व महिला सेवेकरी मोठ्या भांडारात.. शिस्तीत, रांगेत बसल्या ..!! सर्वांच्या हातात पितळी टाळ, गळ्यात त्याचा रुंद कापडी पट्टा ..!! समोर पुरुष सेवेकरी टाळ-मृदुंग घेऊन बसले .. छान खड्या आवाजात, लिड ॲन्ड फाॅलो पध्दतीने भजन सुरु झाले ..!! बघा माऊली ..!!
        संस्थान उत्तम मानसोपचार तज्ज्ञ देखील आहे .. काम करुन श्रमलेल्या जीवांना  मानसिक रिलॅक्सेशन् ..!! मनाची मरगळ दूर करणारा,  शीण, थकवा घालवणारा उत्तम उपचार ..!!
असो ..
       ही सगळी व्यवस्था बघितली की लक्षात येतं, कुठल्याही कामासाठी संस्थान कोणावरही अवलंबून नाही ..!! अगदी आनंद विसावा/ आनंद विहार मधील किरकोळ फर्निचर दुरुस्ती असो की, नवीन फर्निचर बनविणे असो, अथवा प्लंबिंगचे काम, किंवा मार्बल वर्क ..!! सगळ्या साठी संस्थान ची बॅक-अप व्यवस्था तय्यार आहे ..!!
       शेगांव संस्थान सारखे शिस्तबद्ध, स्वच्छ, सुंदर, काटेकोर संस्थान जगात कुठेच नसेल .. ज्यांना हे वैभव पाहता आलं,  ते खरोखरच भाग्यवान ..!!
      🌹🙏||•• जय गजानन ••||🙏🌹
               गण गण गणांत बोते
      🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...