मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
  खिला जो मेरा दिल...                   लेखक                •  डॉ.मोहन खडसे                     संवाद : 9823289010       मा णसाच्या जगण्यात काय महत्त्वाचे आहे? याचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असण्याची शक्यता असते. कुणी म्हणेल आनंद महत्त्वाचा, कुणी म्हणेल पैसे महत्त्वाचे, कुणी म्हणेल प्रतिष्ठा आणि लोकोप्रेम महत्त्वाचे ! मात्र कुणाला असं वाटत असेल तर ते चुकीचं नाहीच की समाधान महत्त्वाचे आहे. आता पुन्हा तेच की प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येकाचा विचार हा महत्त्वाचा आहे आणि त्याचा सन्मान करणे, हे इतरांचे कर्तव्य आहे, जे पूर्ण केले म्हणजे समाधान आपोआप मिळते.संवाद आणि चर्चा नेहमीच होत असतात. कुणी कुणाशी संवाद करताना व्यक्त होणे, हा एक भाग असू शकतो तर त्या व्यक्त होण्यातून इतरांना काही सांगणे, हा दुसरा भागअसू शकतो. असंच एकदा चर्चा सुरू असताना एकजण दुसऱ्याला म्हणाला, 'मला तुमच्यासाठी काही करणे हा आनंदाचा विषय कमी मात्र समाधानाचा विषय जास...
  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी          नव्या नव्या संकल्पनाचे जनक               लेखक :  •  प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे           ( संवाद :  9890967003) ========================= =========================   आ ज प्रशासनात लोकाभिमुख कार्य करून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी राहून विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणे हे सोपे काम निश्चितच नाही.  पण काही सनदी अधिकारी, असे असतात की जे तन-मन-धनाने शासकीय सेवा करीत असतात.  लोकाभिमुख व लोकोपयोगी कार्य हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. अशाच एका अधिकाऱ्याचे नाव आहे, श्री दिलीप स्वामी. त्यांना यावर्षीचा आधुनिक संकल्पना निर्माण केल्याबद्दल व त्या यशस्वीपणे संभाजीनगर मध्ये राबविल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रदिनाला गौरविण्यात येणार आहे. तसे पत्र संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी त्यांना नुकतेच रवाना केले आहे . कल्पक जिल्हाधिकारी  संभाजीनगर सारख्या शहराचे जिल्हाधिकारी पद सांभाळणे म्हणजे अवघड ...
                 अक्षय तृतीया   अ क्षय तृतीया हा दिवस म्हणजे  दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया... अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.        प्रथेप्रमाणे या दिवशी मातीचे घागरीऐवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. गरजूंना, भुकेलेंना अन्नदान होते. प्राणी पक्ष्यांसाठी अन्न, पाणी याची सोय  केली जाते, असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात.       या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्’(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे.आखाजी... पितृ देवोत्सव, दोलोत्सव, वसंतोत्सव, चंदनयात्रा, आखिती, आख्यातरी, अखतारी अशा अनेक नावाने हा सण संपूर्ण देशात साजरा होतो.महात्मा बसवेश्वर यांची  आज जयंती. या उ...
परदेशात शिक्षण शिष्यवृत्तीसाठी १७ मे पर्यंत अर्ज करा •  इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन अकोला,,दि.२९ :   राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.                  या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पी एच डी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) रँकिंग २०० च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय/ अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध आहेत.    परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाचे अटी व शर्ती इत्यादी सविस्तर माहितीसाठी विभागाच्या https://obcbahujankalyan...
          22 वर्षापूर्वीची स्थापना                   लेखक :            •  प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे                   संवाद :  9890967003           मिशन आयएएस आज संपूर्ण भारतामध्ये काम करीत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राचे माजी तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरेसाहेब यांचे प्रधान सचिव व आताचे अपर मुख्य सचिव मा.श्री विकास खारगे यांच्या हस्ते बारा मे 2000 रोजी अमरावतीच्या दंत महाविद्यालयात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री अभिनय कुंभार आय आर एस.( .शिराळा जि.सांगली आता आयकर आयुक्त पुणे)अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री धनराज खामतकर व प्रा.अमोल पाटील हे होते .अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेसाठी सुरू झालेला व विनामूल्य सेवा देणारा हा पहिला उपक्रम.        त्यापूर्वी अमरावती शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी एकही ग्रंथालय किंवा अभ्यासिका उपलब्ध नव्हती.  परंतु विदर्...
  जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची आकाशवाणीवर मुलाखत  अकोला, दि 28 :  सेवा हक्क कायद्याला 10 वर्षे पूर्ण झाले असून सेवा हक्क कायद्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची सुरज गोळे यांनी घेतलेली मुलाखत अकोला आकाशवाणी केंद्रावरून मंगळवार 29 एप्रिल रोजी सकाळी 8.40 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.        अकोला आकाशवाणी एफएम 102.4 Mhz तसेच news on air अँपवरून जगभरात कुठेही ऐकता येईल.
  •  डॉ.संदिप चव्हाण यांची आरोग्यगाथा •  उमेद, ऊर्जा आणि उपचार                 : लेखक :        •   प्रविण शकुंतलाई बाबुलालजी हटकर             Mob .   80552 13281        डॉ.संदिप चव्हाण — हे नाव उच्चारलं की डोळ्या  समोर येतो एक तेजस्वी चेहरा, डोळ्यात करुणा, हृदयात माणुसकी, आणि कार्यात अविरत झोकून देणं. त्यांनी निवडलेली वाट सोपी नव्हती. एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य व्यक्तिमत्वाचा प्रवास प्रारंभ करून खाचखळग्यांनी भरलेली, संघर्षांनी सजलेली वाट तुडवत जाणं आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करणं निश्चितच सोपं नाही ... पण त्यांनी हार मानली नाही. कारण... अंधारल्या वाटा तेजोमय होती । संदिप चालती जी जी वाट ।। जिथे अंधार होता, तिथे त्यांनी आशेचा दिवा लावला. जिथे भय होतं, तिथे विश्वासाचं पाणी शिंपडलं. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी केवळ उपचार केले नाहीत, तर हजारो - लाखो माणसांना आयुष्याची नवी दिशा दिली जगण्याची... कुणाल औषधीच्या तर कुणाला म...
  मिशन आयएएस चळवळीतील अध्वर्यू प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे                     लेखक :     •  प्रा. शरद पुसदकर                               धामणगाव रेल्वे.                                       mob. 9423608651       वि द्वानांकडे विद्या व्यासंग असतो, तर कधी- कधी  लोकसंग्रह नसतो. नेते मंडळीकडे लोकसंग्रह असतो‌, तर काही ठिकाणी विद्वता कमी असते. परंतु ह्या दोन्हीचा मेळ आपल्या ठायी असणार्‍या काही मोजक्या  दुर्मिळ प्रभृती असतात. अमरावती शहरातील असे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे आहेत.ते आता 70 वर्षाचे आहेत. तरुणांना लाजविणार्‍या उत्साहाने व  ऊर्जेने  ते सेवानिवृत्ती  पूर्वी व नंतरही मिशन आय एस एस च्या माध्यमातून 22 वर्षापासून युवकांना प्रेरणा देण्याच्या कामाने झपाटलेले आहेत. ...
  भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन  अकोला :  ग्रामदेवता  श्री राजराजेश्वर मंदिरात विशेष पूजा अर्चना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण व्हावे, तसेच महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा कल्याणार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला  ताकद प्रदान करावी, अशी प्रार्थना भाजपा प्रदेश  कार्यकारी अध्यक्ष   रवींद्र चव्हाण यांनी  आज  येथे श्री  राजराजेश्वराला केली आहे.          पश्चिम विदर्भाच्या नऊ जिल्ह्याच्या बैठकीसाठी राजराजेश्वर नगरीमध्ये आगमन झाल्यावर सर्वप्रथम ग्रामदेवता जागृत राजेश्वर मंदिरात महादेवाला अभिषेक विशेष पूजा अर्चना केली व यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी राजेश्वर मंदिराला वर्गाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू असून तसेच 500 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरीसाठी राज्य शासनाकडे  पाठविला असल्याचे सांगितले. व यासंदर्भात आपण सर्वतोपरीने मदत करून पुरातन जागृत देवस्थानाची संस...
• पालकांना भावनिक शहाणपण कसं येणार? है                          • लेखक- मयुरेश डंके         गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास २५ छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या ३५० हून अधिक विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याचा योग आला. साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भेटी झाल्या, अजूनही हा ओघ सुरूच आहे. या सर्वच्या सर्व मुलांकडून “मला पुण्यातच जायचंय” या तीन शब्दांखेरीज दुसरा शब्द मी ऐकला नाही आणि विशेष म्हणजे पालकांचाही याला पाठिंबा आहे.         “मला जे जे मिळालं नाही ते ते सगळं मी माझ्या मुलांना देणार” असा बहुतेक सर्व पालकांचा दृष्टीकोन दिसतो आहे. आणि या सगळ्या “जे जे - ते ते” मध्ये ज्या गोष्टींची काडीमात्र आवश्यकता नाही, त्या सगळ्या गोष्टी पालकांनी दिलेल्या मला आढळल्या. मी ज्या ज्या मुलांना भेटलो त्यातल्या सर्वच्या सर्व मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली आहे आणि निम्म्याहून अधिक मुलांच्या खोलीमध्ये एसी आहे. एकूणएक मुलांकडे स्मार्टफोन्स आहेत. अनेक मुलं-...
  फोटो चुकला, निकाल हुकला ... ...आणि रजत कलेक्टर झाला     लेखक :  प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे                    संवाद :  9890967003         अ मरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील रजत कालपरवाच्या निकालामध्ये आयएएस ही परीक्षा  पास झाला आहे. धामणगाव हे तसे व्यापारी गाव. अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध गाव. हे गाव विद्यानगरी म्हणून ओळखले जाते. कारण इथली धामणगाव एज्युकेशन सोसायटी खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या बाबतीत सशक्त आहे. या संस्थेच्या आदर्श महाविद्यालयात मी मराठीचा प्राध्यापक म्हणून काम केले आहे. या गावातला रजत नावाच्या एक मुलगा गावातच शकतो आणि आयएएस होतो. खर म्हणजे तो दोन वर्षांपूर्वीच आय ए एस झाला असता.  पण फोटो चुकला आणि निकाल हुकला असेच म्हणावे लागेल.  पहिल्यांदा आयएएस पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तो आयएएसची मुलाखत द्यायला गेला. फॉर्म भरताना त्याने दाढीवाला फोटो फॉर्म वर लावला होता. प्रत्यक्ष मुलाखत देताना मात्र तो दाढी काढून व दाढी करून मुलाखतीला गेला होता. समिती...
  • मा.रवींद्र चव्हाण राजेश्वरनगरीत •   विदर्भातील नऊ जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा  संघटनात्मक आढावा  अकोला :  भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा  माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण राजेश्वर नगरीमध्ये 26 एप्रिल रोजी हिंगोली येथून रात्री नऊ वाजता अकोल्यात येत आहेत.  रविवार दि. 27 एप्रिल रोजी पश्चिम विदर्भातील नऊ जिल्ह्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बाराशे 42 कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व संघटनात्मक आढावा संघटन पूर्व व गाव वस्ती अभियाना संदर्भात आढावा घेणार आहेत.  प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक सिटी स्पोर्ट मुर्तीजापूर रोड येथे ही बैठक होत आहे.         या बैठकीत सर्व जिल्हाध्यक्ष, तसेच प्रत्येक जिल्ह्यातून शंभर लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी अपेक्षित असून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर,   नामदार अशोक उईके, खासदार अनुप धोत्रे खासदार, अनिल बोंडे, नवनीत राणा, जिल्ह्यातील आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार व...
  शेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टर          नम्रता ठाकरे                  लेखक :   प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे ए का शेतकऱ्याच्या मुलीने मनापासून सातत्याने अविरत प्रयत्न केले, तर ती देखील  कलेक्टर होऊ शकते हे नम्रता ठाकरे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. अमरावतीपासून जवळपास 115 किलोमीटरवर तिचे गाव आहे . म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर.अमरावती ते वरुड आणि वरुड ते हातुर्णा असा प्रवास करावा लागतो.       नुकत्याच जाहीर झालेल्या आयएएस या परीक्षेमध्ये नम्रता ठाकरे यांनी सुयश संपादन केलेले आहे. तिच्या यशाची बातमी खासदार डॉ. अनिल बोंडे यांना कळताच त्यांनी मुंबईवरून मला फोन केला आणि माझ्या वतीने तुम्ही हातुर्णा येथे जाऊन नम्रताचे अभिनंदन करा व तिला अमरावतीला दोन तारखेला सायंकाळी पाच वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभाचे निमंत्रण द्या असे सुचवले.  मी आमचे वरुडचे पत्रकार मित्र श्री गिरीधर देशमुख यांना फोन केला. त्यांना नम्रताबद्दल विचारले. ते अमरावतीतच होते...