मुख्य सामग्रीवर वगळा

 


खिला जो मेरा दिल...

                  लेखक

             •  डॉ.मोहन खडसे

                   संवाद : 9823289010


      माणसाच्या जगण्यात काय महत्त्वाचे आहे? याचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असण्याची शक्यता असते. कुणी म्हणेल आनंद महत्त्वाचा, कुणी म्हणेल पैसे महत्त्वाचे, कुणी म्हणेल प्रतिष्ठा आणि लोकोप्रेम महत्त्वाचे ! मात्र कुणाला असं वाटत असेल तर ते चुकीचं नाहीच की समाधान महत्त्वाचे आहे. आता पुन्हा तेच की प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येकाचा विचार हा महत्त्वाचा आहे आणि त्याचा सन्मान करणे, हे इतरांचे कर्तव्य आहे, जे पूर्ण केले म्हणजे समाधान आपोआप मिळते.संवाद आणि चर्चा नेहमीच होत असतात. कुणी कुणाशी संवाद करताना व्यक्त होणे, हा एक भाग असू शकतो तर त्या व्यक्त होण्यातून इतरांना काही सांगणे, हा दुसरा भागअसू शकतो. असंच एकदा चर्चा सुरू असताना एकजण दुसऱ्याला म्हणाला, 'मला तुमच्यासाठी काही करणे हा आनंदाचा विषय कमी मात्र समाधानाचा विषय जास्त आहे, कारण आपण आपल्या या आयुष्यामध्ये कोणासाठी काही केलं हे लोकांना समजलं नाही तरी चालेल मात्र ते स्वतःला नक्कीच माहीत असतं ज्याचे रूपांतर आपोआप समाधानात होते यात शंकाच ती काय?' माणसाच्या कोणत्याही कृतीचं एकदा त्याला समाधान मिळालं म्हणजे त्याला आनंद हा आपोआपच मिळतो हेही तितकेच खरे. यात मात्र अडचण अशी आहे की माणूस हा समाधानासाठी कमी आणि आनंदासाठी जास्त धडपड करतो आणि त्यात कुणाला यश येतं कुणाला येत नाही. आनंदासाठी काही करताना मग ते कृती करणं असो, विचार करणे असो, प्रयत्न करणे असो की एखादी वस्तू विकत आणणे किंवा खाणे असो ! त्यामध्ये स्वतःचा विचार हा अधिक प्रमाणात करण्यात येतो तो तसा चुकीचा नाहीच मात्र इतरांसाठीही काही करण्याचा माणसाने प्रयत्न केला तर त्याला आनंद आणि दोन्ही समाधान हे दोन्ही एकाच वेळेला मिळतात यात शंकाच नाही. मग अशावेळी माणसाला 'हिमालय की गोद मे' सिनेमातलं मनोज कुमार आणि माला सिन्हा यांनी गायलेलं गाणं आठवू शकते ते असं की -



खिला जो मेरा दिल सारी बगिया खिली....

आनंदात समाधान नसते का? नक्कीच असते. माणसाने त्याच्या कुटुंबातील, मित्र परिवारातील, नातेवाईकांमध्ये कोणासाठी काही केलं तर त्याचा आनंद सगळ्यांना होतो आणि त्याचं समाधान हे नक्कीच त्याला असतं म्हणजे आनंदात समाधान असतं हे खरं! पण समजा एकाने दुसऱ्यासाठी काही केलं आणि ते त्याला माहीत नसलं पण जे केलं ते चांगलं केलं असल्याने, ज्याचं चांगलं झालं त्याला आनंद होतो मात्र करणाऱ्याला आनंद आणि समाधान दोन्ही प्राप्त होतात. आपण कोणासाठी काही करतोय हे 'दाखवण्यात' आनंदही मिळतो आणि समाधानही मिळतं मात्र त्याची चव काही वेगळी असते जी फार काळ माणसाच्या मनात टिकेलच याची खात्री नाही. अशातच जर माणसाने दाखविण्याचा प्रयत्न केला नाही पण करून टाकलं तर त्याचा आनंद आणि समाधान माणसालाच मिळतं. हा कुणाला स्वार्थीपणा वाटत असेलही मात्र इतरांनी माणसाच्या उपकाराखाली दबून राहू नये, म्हणूनही असं केलं तर काय हरकत आहे? पुन्हा तेच की काय करावं आणि काय करू नये, का करावं आणि का करू नये, हा ज्याच्या-त्याच्या विचारांचा अन् वृत्तीचा फरक असतो. याचं कारणही तसंच आहे कारण हा ज्याच्या-त्याच्या आनंदाचा विषय असतो, ज्याच्या त्याच्या समाधानाचा विषय असतो. कुणाला कशाचा आनंद तर कुणाला कशात समाधान मिळेल, हे कुणाला तरी सांगता आलं आहे काय? 



आनंद कोणालाही आवडतो, आवश्यकही आहे मात्र समाधानाला महत्त्व तेवढेच आहे की नाही?  खरं तर माणसाने एक काही तरी निवडण्याकडे लक्ष दिलेच पाहिजे, कारण की सगळंच काही एका वेळेला माणसाला मिळू शकत नाही. भारताच्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने, विविध ठिकाणी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही चांगले मिळते तर काही मिळत नाही हे सत्य आहे.

      संत कबीर त्यांच्या एका दोह्यात म्हणतात की - 

चिंटी चावल ले चली

 बीच में मिल गई दाल

 कहे कबीर दो ना मिले 

इक ले, इक डाल

       माणसाच्या मनात मुळातच असलेल्या मोहाला नियंत्रित करण्यासाठी संत कबीरांनी असे लिखाण खूप केले आहे. वरील दोह्याचा अर्थही फार सोपा आहे. तो असा की आपल्या इवल्याशा तोंडामध्ये तांदुळाचा दाणा घेऊन जाणाऱ्या मुंगीला रस्त्यात डाळ दिसली. तिला डाळीचासुद्धा मोह झाला. मनात घालमेल झाली. ती अशी की तांदूळ सोडावा तरच डाळ मिळेल, डाळ सोडायची तरच तांदूळ मिळेल, पण दोन्ही एकत्र मिळू शकत नाही. काही सोडलं तर काही मिळतं हे सत्य ! आनंद आणि समाधानासंदर्भात हे खरं होऊ शकतं का? दोन्ही गोष्टी एकाच वेळेला मिळणं शक्य आहे काय? शक्य आहे पण त्याला अट आहे ती अशी की माणसाने केलेली कृती ही केवळ त्याच्या आनंदासाठी - नसावी तर इतरांच्या आनंदासाठीच असावी, तरच माणसाला आनंद आणि समाधान एकाच वेळेला मिळण्याची शक्यता असते. मनाची प्रसन्नता निर्माण होते ती अशाच वृत्तीमुळे!

(प्रस्तुत लेखक हे प्रख्यात स्तंभलेखक, शिक्षणतज्ज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन, अकोलाच्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करताहेत.)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...