प्रशासनातील दीपस्तंभ नवं नव्या संकल्पनाचे जनक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी लेखक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक, मिशन आयएएस अमरावती कॅम्प संवाद : 9890967003 आ ज प्रशासनात राहून लोकाभिमुख कार्य करून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी राहून विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणे हे सोपे काम निश्चितच नाही. पण काही सनदी अधिकारी असे असतात की जे तन-मन-धनाने शासकीय सेवा करीत असतात. लोकाभिमुख व लोकोपयोगी कार्य हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. अशाच एका अधिकाऱ्याचे नाव आहे श्री दिलीप स्वामी. त्यांना यावर्षीचा आधुनिक संकल्पना निर्माण केल्याबद्दल व त्या यशस्वीपणे संभाजीनगर मध्ये राबविल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षीच्या महाराष्ट्र दिनाला गौरविले आहे. कल्पक जिल्हाधि...