मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
  माहे एप्रिल 2025 चे मासिक राशि भविष्य                    •   व्यंकटेश देशपांडे (गुरूजी)      मो. 7499121664/ 9881601459 मेष राशी :-  मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना अपार यश घेऊन येईल. व्यावसायिक जीवनात नवीन कामगिरी साध्य होईल. गुंतवणुकीशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. प्रेम जीवनात नवीन रोमांचक वळणे येतील. तुमच्या व्यावसायिक जीवनात थोडे सावधगिरी बाळगा. तुमच्या करिअरच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. मन प्रसन्न राहील. तुम्हाला आईचा पाठिंबा मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या क्षेत्रातही बदल होऊ शकतो. जास्त मेहनत लागेल. उत्पन्न वाढेल. वृषभ राशी :-  या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुम्हाला अनेक नोकरीच्या ऑफर मिळतील. उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या अनेक...

उष्माघाताला आळा बसतो

माठातील पाणी पिण्याचे फायदे          गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता चांगलीच वाढू लागली आहे. बाजारपेठेतही उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची रेलचेल आहे. थंड पाण्यासाठी वापरले जाणारे माठ, उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, उन्हामुळे कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी ज्युस सेंटर, रसवंतीगृहांवर गर्दी होत आहे.         यातच गरिबांचा फ्रीज म्हणून लौकिक असणारे माठ विक्रीसाठी येत आहेत. वेगवेगळ्या आकारांमध्ये तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये असलेले हे माठ ग्राहकांना आकर्षित करत आहेत. माठ हे माती,  म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे.         आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते. आजही बरेच जण माठातील पाणीच पितात. जाणून घेऊया माठातील  पाणी पिण्याचे फायदे…       माती नैसर्गिकरीत्या अल्कलाइन शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते. त्यामुळे मातीच्या माठात...
  •  मा.राष्ट्रपतींचे मा. स्वीय सहाय्यक  •  रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनचे उद्घाटन थाटात      ( प्रा . डॉ.नरेशचंद्र काठोळे  ) पुणे दि.31 :  भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक श्री रवींद्र जाधव यांच्या स्मृति निमित्त उभारण्यात आलेल्या श्री रविंद्र जाधव ग्लोबल फाउंडेशन या बहुप्रतिक्षित संस्थेचे भव्य उद्घाटन पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या संस्थेची स्थापना आरोग्य सेवा, शिक्षण आणि शाश्वत विकास या तीन मुख्य क्षेत्रांमध्ये सकारात्मक योगदान देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. उद्घाटनाच्या प्रस्तावनेत सुचेता रवींद्र जाधव यांनी त्यांच्या वडिलांचे धन्यवाद व्यक्त करत मिळालेल्या नावाबद्दल  आम्हा सर्व बहिनींना अभिमान वाटतो असे नमूद केले.          याप्रसंगी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशन साठी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन त्यांच्या कन्या सौ ज्योती राठौर यांनी केले तसेच जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ गौरवोद्गार...
  'गुढीपाडवा' - भारतीय हिंदू  कालगणनेचा शास्त्रीय मानबिंदू           •  मोहनशास्त्री जलतारे,               ज्योतिषाचार्य        रविवारी 30 मार्चला,  चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा असल्याने,   ह्या दिवशी 'विश्वावसू' नामक नूतन संवत्सराचा प्रारंभ होत आहे.  ह्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून गुढी उभारावी.  गुढीचे पूजन करीत असताना  'ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाsभिष्ट फलप्रद | प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यम् मद्गृहे मंगलम् कुरु |अशी प्रार्थना करून गोडधोड नैवेद्य अर्पण करावा. आपापल्या कुळाचाराप्रमाणे ह्याच दिवशी श्रीरामचंद्रांच्या किंवा वासंतिक देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होतो.         आपल्या उत्तम आरोग्यासाठी ह्यादिवशी कडुनिंबाची पाने व त्याचा फुलोर घेऊन त्यामध्ये हिंग, जिरे, ओवा, गुळ इत्यादी पदार्थांचे चूर्ण करून ते ह्या दिवशी सेवन करण्याचा जुना प्रघात आहे. हा दिवस भारतीय वर्ष कालगणनेचा,  खगोलीय गणितीदृष्ट्या वैज्ञानिक महत्त्व असल...
•    "गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?"  •   आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध       मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली  जाते.  बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते... असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी..  म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो...       या दिवशी गुढीला श्रीखंड पुरी चा  नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक ...
•  आ. वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते •   ‘क्यूं ना भजूं मै राम नाम’ चे विमोचन अकोला :  वरिष्ठ केंद्रीय अधिकारी डॉ. अनंत दुबे यांच्याद्वारे लिखित श्रीराम नामाच्या धुनवर आधारित भजन ‘क्यूं न भजूं मैं राम नाम’ च्या द्वितीय भागाचे विमोचन आ. वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यावसायिक सुनिल पसारी प्रामुख्याने उपस्थित होते.      केंद्रीय अधिकारी डॉ. अनंत दुबे यांनी लिहीलेल्या भजनाचा हा संग्रह असून या भजनाच्या स्क्रीप्टमध्ये जवळपास 5 हजार शब्दांचा समावेश आहे. हा संग्रह आगामी काळात सर्वात लांब भजन म्हणून एक किर्तीमान ठरणार आहे. या भजनाच्या प्रथम भागाचे विमोचन हे अयोध्यामध्ये श्री राम लला मंदिराच्या शुभारंभाच्या एक दिवस आधी करण्यात आले होते.        ज्यामध्ये इंडियन आयडलचे कलावंत अमोल सकट यांनी भजन गायले होते. आता या संकलनाच्या द्वितीय आवृत्तीची भजने अपूर्व शुक्ला द्वारा गाण्यात येणार आहेत. या भजनाच्या द्वितीय आवृत्तीचे येणा-या रामनवमीला उद्घाटीत करण्यात येणार आहे. या राम धुन भजनात रामायणातील जवळपास 500 पात्रांचा समावेश आहे. 
यशदाचे मानक संचालक रंगनाथ नाईकडे          दरवर्षीप्रमाणे आमचे अमरावती जिल्ह्यातील नागपूर हायवे वरील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी  ह्या आश्रमातील भव्य सभागृह येथे डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीतर्फे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर सुरु होते. तेव्हा मा.श्री. शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय मंत्री होते. त्यांचे सचिव श्री रंगनाथ नाईकडे भारतीय वन सेवा हे माझे मित्र होते.श्री. रंगनाथ नाईकडे म्हणजे स्पर्धा परीक्षेला शंभर टक्के वाहिलेले व्यक्तिमत्व .मी त्यांना निमंत्रण दिले होते .त्यांचा मला फोन आला  काठोळे मी शिबिराला येत आहे. ते अमरावतीला पोहोचले. शासकीय कामे आटोपून त्यांनी मला फोन केला. काठोळे मी निघालो आहे .अमरावती ते मोझरी हे साधारणपणे पंचवीस मिनिटांचे अंतर आहे. आम्ही गुरुकुंज मोझरीच्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमाच्या महाद्वारावर नाईकडे साहेबांच्या लाल दिव्याच्या गाडीची वाट पाहत होतो. झाले वेगळेच. आमच्यासमोर एक नँनो येऊन थांबली.  गाडी बाहेरून पूर्ण रंगवलेली होती .कुठल्यातरी ड्रायव्हिंग स्कूलची ...

आरोग्य संपदा

  आंब्याच्या पानाचे उपयोग   आंबा   फळांचा राजा, म्हणून ओळखला जातो. कारण हा केवळ फळच देत नाही तर, याची पाने देखिल तितकिच फायद्याचि असतात..  ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आंब्याचि पाने म्हणजे एक रामबाण औषध आहे.  दररोज एक कोवळे आंब्याचे पान  रिकाम्या पोटी सकाळि खाल्यास  फार लवकर उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. दररोज रात्रि एका वाटित पाणि घेउन त्यात काहि आंब्याचि पाने घालून ठेवा  मग सकाळि ती पाने काढून फक्त ते पाणि प्यावे, हे पाणि मधूमेही रूग्णांकरता एक वरदानस्वरूपिच आहे.. रक्तशर्करा  कायम नियंत्रित राहते..     आंब्याचि पाने वाळवून त्याचे चूर्ण बनवून ठेवा रोज रात्रि एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हे चूर्ण मिसळून मग सकाळि हे  प्यावे, मूत्रखडा विरघळून बाहेर पडतो.तसेच यक्रुताचे आजार जसे लिव्हर सिरोसिस, काविळ, प्लिहाव्रूद्धि बरे होतात ..              
  •  अकोल्याच्या श्रीराम भजनी मंडळाने संतनगरी शेगावात सादर केली बहारदार भजने अकोला :  श्रीराम भजनी मंडळ जुने खेतान नगर, कौलखेड, अकोलाच्या वतीने अलिकडेच विदर्भाची पंढरी समजल्या जाणाय्रा संतनगतरी शेगावच्या संत श्री गजानन महाराज मंदिरात महिला मंडळींनी बहारदार भजने सादर करुन भाविक भक्ताना मंत्रमुग्ध केले. मंदिर परिसरातील भाविकांनी महिला भजनी मंडळीची स्तूती केली.       आताच्या अत्याधुनिक जगात एक विशिष्ट वयानंतर छंदाना वाव मिळणे अशक्य असते. घरसंसार यामधून वेळ काढणे तर त्याहीपेक्षा कठीण, अशा धकाधकीच्या जीवनात देव भक्तीचा छंद बाळगत अकोला येथील प्रख्यात  श्रीराम भजनी मंडळ जुने खेतान नगर कौलखेड अकोला हे भजनी मंडळ एक महिला भजनी मंडळ असून त्यांच्या सरावांना यश आणि नारीशक्ती एकवटून मंडळाला दिनांक:- 24/03/2025 सोमवार रोजी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव जिल्हा बुलढाणा येथे भजन रंगारंग कार्यक्रमाची संधी मिळाली. याच संधीचे सोन तसेच त्यांच्या सरावास यश, महिला भजन मंडळ यांच्या भजनाचा बहारदार कार्यक्रमाने संपूर्ण श्री संत गजानन महाराज संस्थान दुमदुमले.     ...
•  स्व.रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनची स्थापना • 29 ला पुणे येथे रितसर उद्घाटन अनेक मान्यवरांची उपस्थिती पुणे दि.28 :   माजी राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांचे स्विय सहाय्यक म्हणून ज्यांनी पाच वर्षं राष्ट्रपती भवनात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्य केले, तसेच अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून ज्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त म्हणून ज्यांनी कुंभ मेळ्याचे उत्कृष्ट आयोजन केले, पुणे येथे राज्य माहिती आयुक्त असताना त्यांनी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असे सर्वांनाच आवडणारे श्री रवींद्र जाधवसाहेब आपल्याला परीचीत आहेतच. यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वर अतोनात प्रेम असणाऱ्या सर्व आप्त जनांनी, मित्र मंडळीने रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशनची स्थापना येत्या शनिवारी  दिनांक 29 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार आयोजित केली आहे. हा कार्यक्रम पुण्याच्या बाणेर विभागातील बीबीसी टॉवरमध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ कांतीलाल संचेती व पुणे विभागीय आयुक्त श्री ...
  ''वैद्यकीय औषधी वनस्पती'' - तुळस !!              तुळशीच्या पानांना भारतात धार्मिक महत्त्व आहे, पण ते औषध म्हणूनही खूप वापरले जातात. तुळशी ही एक अशी वनस्पती आहे, जी प्रत्येक घरात सहज आढळते. तुळशीला पवित्र तुळस असेही म्हणतात.आणि तुळशीचे फायदे खूप चमत्कारिक आहेत.       तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे, अनेक आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार रुग्णालयांमध्ये औषधी वनस्पती बनवण्यासाठीही तिचा वापर केला जातो. या 'वैद्यकीय औषधी वनस्पती' च्या अनेक जाती आहेत, त्यापैकी राम तुळशी आणि कृष्ण तुळशी सर्वात सामान्य आहेत. पण दोघांमध्ये काय फरक आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही कोणता निवडावा? राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्यातील फरक असा आहे.        राम तुळशीचा वापर बहुतेक पूजेत केला जातो. ही तुळस त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. तुळशीच्या या जातीच्या पानांना गोड चव असते. श्यामा तुळशीला 'गडद तुळशी' किंवा 'कृष्ण तुळशी' असेही म्हणतात. या तुळशीची पाने हिरवी व जांभळ्या रंगाची असून त्याची देठ जांभळ्या रंगाची असते.       ...

यशस्वी उद्योजक

  •   बी.एस. उर्फ बाप्पू    देशमुख  यांच्या एकसष्टीनिमित्ताने   जिद्द व परिश्रम याची सांगड घालून आपल्या  नाविन्यपूर्ण प्रयोगाने अकोलेकरांना भूरळ घालणारे यशस्वी  उद्योजक, समाजसेवी आदरणीय व्यक्तिमत्व  बी.एस. बाप्पु उर्फ बाबुराव साहेबराव देशमुख यांची दिनांक २८ मार्चला २०२५ संध्याकाळी ७ वाजता नेहरु पार्कमध्ये एकसष्टी त्यांच्या परिवाराच्या वतीने मोठ्या धुमधडाक्यात आनंद उत्साहात साजरी होत आहे.                  त्यानिमित्य त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न. माणूस म्हटले की स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी जगण्याची धडपड करणारा व्यक्ती म्हणजे माणूस.   आपण समाजामध्ये सगळीकडेच पाहत असतो. परंतु स्वतः सोबतच स्वतःच्या परिवारासोबतच समाज हितासाठी झटणारा, लढणारा, ध्येयवेडा माणूस अकोला शहरांमध्ये राहतो. सुरुवातीला गणेश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नवीन नवीन प्रयोग करणारे व त्या माध्यमातून वैज्ञानिक पिढी घडवण्याच्या वसा घेतलेले बी.एस .बापू अनेकांनी पाहिले आहे. प्रिंटिंग प्रेस चा ...
  •  उन्हाळ्यात कोणती कपडे घालावित... उन्हाळ्यात आरामदायक आणि थंड राहण्यासाठी योग्य कपड्यांची निवड करणे महत्त्वाचे आहे. येथे काही पर्याय दिले आहेत.   सुती कपडे :  उन्हाळ्यात सुती कपडे घालणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. ते घाम शोषून घेतात आणि शरीराला हवा खेळती ठेवतात. हलक्या रंगाचे कपडे पांढरा, फिकट निळा, पिवळा आणि इतर हलके रंग उष्णता कमी शोषून घेतात आणि तुम्हाला थंड ठेवतात.   सैल कपडे :  घट्ट कपड्यांऐवजी सैल कपडे घाला, ज्यामुळे शरीराला हवा खेळती राहते. लिननचे कपडे : लिनन हे एक नैसर्गिक फायबर आहे जे हलके आणि हवा खेळते ठेवण्यास मदत करते.   हलके डेनिम : जाड डेनिमऐवजी हलके डेनिमचे कपडे निवडा. या व्यतिरिक्त, तुम्ही खालील गोष्टी लक्षात ठेवू शकता: टोपी आणि सनग्लासेस: टोपी आणि सनग्लासेस उन्हाळ्यात सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहेत.   हलके शूज: बंद शूजऐवजी सँडल किंवा इतर हलके शूज घाला. नैसर्गिक फायबर: कृत्रिम फायबरऐवजी नैसर्गिक फायबरचे कपडे निवडा, कारण ते अधिक आरामदायक असतात. कपड्यांचा प्रकार:   सुती कपडे: सुती कपडे हे उन्हाळ्यासाठी सर्वोत...

लोकसेवा आयोगाचे

डॉ.दिलीप पांढरपट्टे        डॉ.दिलीप पांढरपट्टे..          एक कुशल प्रशासक           कविवर्य स्व.सुरेश भटांमुळे अनेक चांगल्या लोकांच्या भेटी झाल्यात. त्यांच्यामुळे काही सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पण भेटी झाल्यात. ती यादी फार मोठी आहे .अमरावतीला विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणारे  श्री दिलीप पांढरपट्टे यांचा माझा परिचय कविवर्य सुरेश भट व गझल सम्राट श्री भीमराव पांचाळे यांच्यामुळे झाला. अमरावती विभागाला स्व. सुरेश भटांवर नितांत प्रेम करणारे विभागीय आयुक्त अमरावती  विभागाला लाभले होते हे खरंच खरोखरच आमच्या साहित्यिक मित्रमंडळीला आनंदाची पर्वणी होती.        प्रत्येकाला एक छंद असतो आणि तो छंद नकळत विकसित होत असतो. आय.ए.एस.अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे हे उत्कृष्ट सनदी अधिकारी आहेतच. पण गझलेच्या क्षेत्रात त्यांचा चांगला नावलौकिक आहे.  कविवर्य सुरेश भट भीमराव पांचाळे आणि दिलीप पांढरपट्टे हे गझलेचे समीकरण आहे .  खरं म्हणजे सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागे कामांचा खूप व्याप असतो . प...
  •   केवल एक रुपये मे बच्चो को आयएएस का ट्रेनिंग   •  फक्त १ रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था..                        गुजरातला माझे एक मित्र आहेत .श्री रामजीभाई पटेल हे त्यांचे नाव. ते हिऱ्याचे व्यापारी आहेत. साधारणपणे एक हजार कोटी रुपयांची त्यांची  उलाढाल आहे. ते मला नेहमी म्हणायचे  .काठोळे साहेब गुजरातको आओ, पाटीदार भवन देखो.  केवल एक रुपये मे बच्चो को आय ए एस का ट्रेनिंग दिया जाता है .मला उत्सुकता होती .त्यामुळे मुंबईतील माजी शालेय शिक्षण मंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्याकडचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी थेट अहमदाबादला निघालो. अहमदाबादला उमिया माता संस्थान आहे.   येथे देखील आयएएसचे प्रशिक्षण चालते. अजून तेथे मंदिर तयार व्हायचे आहे.  पण IAS सेंटर मात्र तयार झाले, वसतिगृह तयार झाले.   या आयएएस ट्रेनिंग सेंटर मधील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी आयपीएस ऑफिसर नेमले गेले.  मंदिर नंतर पण आयएएस सेंटर अगोदर. खरा हा गुजरातचा पॅटर्न मला खूप आवडला.  ...