मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

🌹29 जुलै रोजी असलेल्या 29व्या पुण्यस्मरणानिमित्त...

     दृष्टी असलेला कुलगुरू         स्व.दादासाहेब काळमेघ                       लेखक  प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे               संस्थापक संचालक      मिशन आयएएस अमरावती कॅम्प          संवाद : 9890967003 ✍🏻 मा झ्या 73 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी सामाजिक राजकीय साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरपूर वावरलो. या सर्व क्षेत्रात वावरत असताना मला दृष्टी असलेले फार कमी लोक मिळाले. त्यामध्ये दादासाहेबांचा क्रमांक फार वरचा आहे. दादासाहेब  काळमेघ हे व्यक्तिमत्व आगळे वेगळे होते. अशी माणसे फार कमी जन्माला येतात. दादासाहेबांनी आपल्या बोलण्याने वागण्याने संस्काराने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. त्यामुळे आज त्यांना जाऊन 29 वर्ष जरी झाली तरी सर्वजण त्यांची आवर्जून आठवण काढतात.          मला आठवते दादासाहेब काळमेघ हे श्री शिवाजी संस्थेचे अध्यक्ष होते. प्रत्येक वेळेस बहुमत पाठीशी असेल असे नाही .पण त्यांनी त...
अलीकडील पोस्ट

शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे 'Cyber Shiksha for Cyber Suraksha Club' च्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत सायबर वॉरियर्सच्या दहा गटांचे लाईव्ह प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्विक हील फाउंडेशन, पुणे येथील श्री. नागेश तलारी हे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते.

      अकोल्यात सायबर              वॉरियर्सचे प्रभावी लाईव्ह                 प्रेझेंटेशन        अकोला : शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे 'Cyber Shiksha for Cyber Suraksha Club' च्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत सायबर वॉरियर्सच्या दहा गटांचे लाईव्ह प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले.         या कार्यक्रमासाठी क्विक हील फाउंडेशन, पुणे येथील श्री. नागेश तलारी हे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा, डिजिटल गोपनीयता, सुरक्षित पासवर्ड आणि जबाबदार इंटरनेट वापर यांसारख्या विषयांवर प्रभावी सादरीकरण केले.         महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. डॉ. दीप्ती हेमंत पेठकर, विभागप्रमुख, संगणकशास्त्र विभाग तथा समन्वयक यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.         विद्या...

श्री तुकाराम मुंढे यांचा पूर्ण प्रवासच म्हणजे एका चित्रपटाचे कथानकासारखे आहे. पुढे मागे चित्रपट निघेलही. पण त्यांचा जीवन प्रवास हा प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा जागविणारा पुढे नेणारा असाच आहे. शेती करून प्रसंगी उपाशी राहून महाविद्यालयात पायी जाऊन या विद्यार्थ्याने संघर्ष करून जे यश गाठलेले आहे. ते निश्चितच महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिण्यासारखे आहे.

श्री.तुकाराम मुंढेचा संघर्षमय प्रवास  दिल्ली,पुणे,मुंबई, संभाजीनगर                         लेखक  प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे               संस्थापक संचालक      मिशन आयएएस अमरावती कॅम्प          संवाद : 9890967003   🔷जो मुलगा आपल्या विद्यार्थी जीवनात टी-शर्ट विकत घेऊ शकला नाही. दोन रुपयात वडापाव स्वस्त मिळतो म्हणून थोडे पायी अंतर जाऊन  दोन रुपयांची बचत करणारा तुकाराम आज महाराष्ट्रातील सनदी अधिकाऱ्यांतील सर्वात चर्चेचा लोकप्रिय व समाजाभिमुख सनदी अधिकारी बनलेला आहे.           श्री तुकाराम मुंढे यांचा पूर्ण प्रवासच म्हणजे एका चित्रपटाचे कथानकासारखे आहे. पुढे मागे चित्रपट निघेलही. पण त्यांचा जीवन प्रवास हा प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा जागविणारा पुढे नेणारा असाच आहे. शेती करून प्रसंगी उपाशी राहून महाविद्यालयात पायी जाऊन या विद्यार्थ्याने संघर्ष करून जे यश गाठलेले आहे. ते निश्चितच महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिण...

यावेळी महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. संजय गरकल,महाव्यवस्थापक (विपणन) व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाकरे, प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुणी,श्री.यादव महा व्यवस्थापक वित्त यांच्यासह महाबीज मुख्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    महाबीज मुख्यालयात निनादले भक्तिगीतांचे सूर      महाबीज मुख्यालयात          आषाढी महोत्सवानिमित्त        'भक्तिरंग’ कार्यक्रम          ✍🏻 अकोला : पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून भावभक्ती, समता, विज्ञानवादी विचारांचा संदेश देणारी वैश्विक ओळख आहे. संतांनी मांडलेले विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे जीवनात यश आणि समृद्धीची कापणी करायची असेल, तर भक्ती आणि सकारात्मक विचारांची पेरणी करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले.        ते महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या मुख्यालयात आषाढी महोत्सवाच्या निमित्ताने  पार पडलेल्या भक्तिरंग कार्यक्रमात बोलत होते..         यावेळी महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. संजय गरकल,महाव्यवस्थापक (विपणन) व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाक...

आजचे राशिभविष्य सोमवार,दि.२७ जुलै २०२६

                     आजचे राशिभविष्य सोमवार,दि.२७ जुलै २०२६ (आजचे दैनिक पंचांग) विक्रम संवत 2083, शक संवत 1948 (पराभव संवत्सर), आषाढ त्रयोदशी तिथी दुपारी 04:15 पर्यंत, त्यानंतर चतुर्दशी  सकाळी 10:28 पर्यंत नक्षत्र मूळ, त्यानंतर पूर्वाषाढ, रात्री 10:54 पर्यंत वैधृती योग, त्यानंतर विष्कुंभ योग, करण तैतिल दुपारी 04:15 पर्यंत, त्यानंतर गर 05:19 पर्यंत, त्यानंतर वणीज. _______________ सुविचार 71. आशा कधी सोडू नका. ______________________________ स र्व प्रकारच्या पूजा,वास्तू व ज्योतिष शास्त्रविषयक माहितीसाठी संपर्क पंडीत व्यंकटेश देशपांडे   (गुरुजी) संवाद :     7499121664                 9881601459. ____________ आजचे राशिभविष्य (सोमवार,दि २७ जुलै २०२६) मेष राशी :- आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि काही शुभ प्रसंगांचे नियोजन केले जाऊ शकते. प्रेमसंबंध अधिक सुसंवादी होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात चांगले यश मिळू शकते. आरोग्य चांगले राही...

"ज्ञानोबा-तुकाराम" तसेच विठ्ठल नामाचा अखंड गजर करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा भक्तिमय वातावरणाने भारावून टाकली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड आणि गौळण सादर केली

आषाढी एकादशीचा पालखी सोहळा खंडेलवाल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर  पालखी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन 🔷 अकोला : स्थानिक गोडबोले प्लॉट डाबकीरोड स्थित खंडेलवाल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर  पालखी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री. विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदंग, भगवे ध्वज आणि तुळशीची रोपे हातात घेऊन पालखीची मिरवणूक काढली.          "ज्ञानोबा-तुकाराम" तसेच विठ्ठल नामाचा अखंड गजर करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा भक्तिमय वातावरणाने भारावून टाकली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड आणि गौळण सादर केली.  पंढरपूर मध्ये पोहोचणाऱ्या पालखी पैकी मुख्य पाच ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान देव आणि मुक्ताबाई यांच्या पालख्यांचे प्रदर्शन करण्यात आले.  त्यादरम्यान रिंगण सोहळ्याचे आयोजन सुद्धा केले होते.        कार्यक्रमाचे सूत्रांचलन कु.ओवी चीने आणि प्रणाली शेलार यांनी केले....

🌹दैनिक देशोन्नतीत दर रविवारी प्रसिद्ध होणारा स्तंभ..'कवडसा'

"प्रश्न सारखे पण उत्तरं नाही.." 🔷मा णसाच्या शरीराची ओपीडी असते तसेच माणसाच्या मनाची असावी, नव्हे ती असते मात्र त्याकडे कोणी लक्ष फारसं देत नाही. आज अनेक लोक शरीराने नव्हे तर मनाने थकलेले असतात. चेहऱ्यावर दिसत नाही पण मनात वेदना असतात. काहींच्या तर बँक खात्यात लाखो रुपये असतात मात्र मनात समाधान नसते. ते एखाद्या वर्तमानपत्रात बातमी आली का ? माझं नाव आलं का ? याकडे लक्ष देत राहतात.          छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने नाव छापून येतं, हे त्यांना माहीत असल्यामुळे ते सहभागी होतात. कारण त्यांच्या मनात समाधान नसतं. मनमोकळं करताना ,कधी - कधी स्वत:चा खिसा सुद्धा काहीसा ‌रिकामा करावा लागतो हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांना समाधान  कधीही प्राप्त होत नाही, हे सत्य !          खरंतर माणसाच्या मनाचे निरीक्षण व्हायला पाहिजे कारण त्याशिवाय निदान होत नाही आणि निदाना शिवाय उपचार करणे अशक्य असते. माणूस कोणीही असो, माणसाच्या मनात जमा झालेला राग,मत्सर ,भीती ,लोभ,अपराधीपणा, अहंकार आणि विविध प्रकारच्या नकारात्मक भावना ह्या त्यालाच हळूह...