कर्जमाफीत ‘तारीख पे तारीख'; शेतकऱ्यांची थट्टा! ३० जूनची मुदत पुन्हा वाढविल्याने किसान ब्रिगेड संतप्त सातबारा कोरा कोरा न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ✍🏻 अकोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत ३० जूनऐवजी ५ जुलैपर्यंत वाढविण्याच्या निर्णयावर किसान ब्रिगेडने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुदतवाढीच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप करत कोणतीही चालढकल न करता सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचा सातबारा तातडीने कोरा करावा, अशी मागणी केली आहे. किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी चंदीगड येथे देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या तयारीसाठी दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने घोषित करण्यात आलेल्या योजनेची अंमलबजाव...