मुख्य सामग्रीवर वगळा

सातबारा कोरा कोरा न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

कर्जमाफीत ‘तारीख पे       तारीख'; शेतकऱ्यांची थट्टा!
    ३० जूनची मुदत पुन्हा              वाढविल्याने किसान
        ब्रिगेड संतप्त
सातबारा कोरा कोरा न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
✍🏻अकोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत ३० जूनऐवजी ५ जुलैपर्यंत वाढविण्याच्या निर्णयावर किसान ब्रिगेडने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुदतवाढीच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप करत कोणतीही चालढकल न करता सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचा सातबारा तातडीने कोरा करावा, अशी मागणी केली आहे.
        किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी चंदीगड येथे देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या तयारीसाठी दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
        यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने घोषित करण्यात आलेल्या योजनेची अंमलबजावणी वारंवार पुढे ढकलणे म्हणजे त्या थोर व्यक्तिमत्त्वाचाही अपमान असल्याचा घणाघाती आरोप केला. सरकारने शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांची 'तारीख पे तारीख' देणे थांबवून प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
        कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, सरकारने आता घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी किसान ब्रिगेडने केली आहे. 
किसान ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष दिवाकर गावंडे, जिल्हाध्यक्ष भगवंतराव गवळी, कार्याध्यक्ष शरद वानखडे, उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, सरचिटणीस प्रदीप चोरे, सचिव राजेश मावळे, रामधन दामोदर, सिद्धार्थ तायडे आणि रवींद्र जवंजाळ यांनीही सरकारने जाहीर केलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा
दरम्यान, किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मिश्रा यांनी सरकारला इशारा देताना, शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करण्यात यावा. अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या तीव्र असंतोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले.
००००००००००००००
🌴||झाडे लावा🌴झाडे जगवा||🌴
🌴 वृक्ष वाचवा🌴पृथ्वी वाचवा 🌴
०००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
(PRO)
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) 

 डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
    संवाद : 9371854706      
हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .
Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706
  ____________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...