मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमरावती शहरातील भव्य अशा सिकची रिसॉर्टमध्ये

मिशन आयएएसतर्फे ग्रीष्मकालीन  स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर              (प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे )        अमरावती : स्पर्धा परीक्षेच्या जगतात संपूर्ण भारतात विनामूल्य काम करणाऱ्या व दुसऱ्या वर्गापासून आयएएस या परीक्षेचे केवळ एक रुपया प्रतिदिन इतक्या अल्पशुल्कामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस आणि वलगावच्या श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे येत्या उन्हाळ्यात ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.       हे सात दिवसांचे शिबिर मे महिन्यात अमरावती शहरातील सर्वात भव्य असलेल्या शिकची रिसॉर्ट मध्ये संपन्न होणार आहे. मिशन आयएएस ही भारतामधील प्रतिष्ठीत सेवाभावी संस्था असून गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या संस्थेने स्पर्धा परीक्षा विषयक विविध उपक्रम आयोजित केले आहेत.         या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आय ए एस या संस्थेचे उद्घाटन महाराष्ट्राचे सध्याचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी के...
       हरभऱ्याची कोवळी पाने     म्हणजेच 'हरभऱ्याची भाजी           हि वाळ्यातील एक अस्सल गावरान मेजवानी आहे. हरभरा जेव्हा शेतात डोलू लागतो, तेव्हा त्याचे शेंडे खुडून ही भाजी तयार केली जाते. ही चवीला किंचित आंबट आणि आरोग्यासाठी अत्यंत पोषक असते.         या भाजीचे काही खास फायदे आणि माहिती खालीलप्रमाणे आहे. हरभऱ्याच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे       पचनशक्ती सुधारते : - या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात 'फायबर' असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते.         रक्ताची कमतरता दूर करते:- लोहाचा (Iron) उत्तम स्रोत असल्यामुळे ज्यांना अ‍ॅनिमिया किंवा रक्ताल्पता आहे, त्यांच्यासाठी ही भाजी वरदान आहे. हाडांसाठी फायदेशीर: - यात कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.         मधुमेहासाठी उपयुक्त:- रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हरभऱ्याची भाजी गुणकारी मानली जाते.        वजन ...
            महत्त्वाची बातमी!  २०२६ च्या अखेरपर्यंत सोने आणि चांदीचे दर किती असणार? तज्ञांनी आकडाच सांगितला!       ए का वर्षात सोन्याची किंमत दुप्पट झाली आहे. आता प्रश्न असा आहे की, २०२६ अखेरपर्यंत सोन्याची चमक कायम राहील की ही वाढ मंदावेल. आर्थिक सर्वेक्षणानुसार, २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव २,६०७ डॉलर्सवरून ४,३१५ डॉलर्स प्रति औंस झाला. जानेवारी २०२६ च्या अखेरीस हा भाव ५,१०१ डॉलर्स प्रति औंसच्या आसपास पोहोचला. या प्रचंड वाढीमागे अनेक प्रमुख कारणे होती.सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरचे कमकुवत होणे. जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याकडे वळतात. शिवाय जगभरातील भू-राजकीय तणाव, युद्धाचे धोके आणि आर्थिक अनिश्चितता यामुळेही सोने सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. आर्थिक सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, दीर्घकालीन नकारात्मक वास्तविक व्याजदरांच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.भारतीय बाजारात ३० जानेवारी २०२५ रोजी एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹८१,०२८...

आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. याचा सगळ्यात मोठा स्त्रोत सुर्याची किरणे हा आहे.

   सूर्यप्रकाशातून व्हिटामीन     'डी' मिळण्याची योग्य वेळ व्हि टामीन डी आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. याचा सगळ्यात मोठा स्त्रोत सुर्याची किरणे हा आहे. हे व्हिटामीन आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस अवशोषित करण्यास मदत करते. जे हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते.         या व्यतिरिक्त व्हिटामीन डी इम्यून सिस्टिम चांगली ठेवता येते.  ज्यामुळे शरीरात इन्फेक्शन होत नाही आणि आजारांपासूनही बचाव होतो. हृदय आणि ब्लड वेसल्सही चांगल्या राहतात. मानसिक आरोग्य चांगले राहते. व्हिटामीन डी मुळे डिप्रेशन, एन्झायटीआणि अन्य  मानसिक आजार बरे होतात.          व्यवस्थित ऊन असते पण बऱ्याच लोकांमध्ये व्हिटामीन डी ची कमतरता असते. या मागे अनेक कारणं असू शकतात. लाईफस्टाईलमधील बदल, सुर्याच्या किरणांमध्ये न जाणं यामुळे व्हिटामीन डी व्यवस्थित मिळत नाही. एक्सपर्ट्स सांगतात की सकाळी १० ते १२ वाजताची वेळ ही सगळ्यात उत्तम आहे.  यावेळी सुर्याची अल्ट्राव्हायलेट बी किरणं त्वचेवर सरळ पडतात.          ज्यात...

आजचे राशिभविष्य रविवार, दि.१ फेब्रुवारी २०२६

  आजचे राशिभविष्य  रविवार, दि.१ फेब्रुवारी २०२६   विक्रम संवत 2082, शक संवत 1947 (विश्ववसु संवत्सरा), माघ पौर्णिमा तिथी पहाटे 03:39 पर्यंत, त्यानंतर प्रतिपदा नक्षत्र पुष्य रात्री 11:57 पर्यंत, त्यानंतर आश्लेषा सकाळी 10:18 पर्यंत प्रीती योग , त्यानंतर आयुष्मान योग, करण व्यष्टी दुपारी 04:43 पर्यंत, त्यानंतर बावा 03:39 पर्यंत, त्यानंतर बालव.     ०००००००००००००००००००००० मेष राशी  :- आजचा दिवस अनावश्यक धावपळीत घालवण्याचा असेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल थोडे काळजी वाटेल. कुटुंबात अचानक अपघात होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा काही मोठे काम तुमच्या हातातून निसटू शकते. कुटुंबातील परस्पर मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशी :- आज तुम्हाला काही खास कामाची खूप चिंता असेल, परंतु आज त्यात यश मिळणे शक्य नाही. कुटुंबातील मुले आणि पत्नीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण आणि आर्थिक परिस्थितीशी झुंजावे लागेल. विरोधक व्यवसायात अडथळे निर्माण करतील. आज कोणताही मोठा व्यवहार करू नका. मिथुन राशी :- आज ...

माहे फेब्रुवारी 2026 चे मासिक राशी भविष्य

    माहे फेब्रुवारी 2026 चे           मासिक राशी भविष्य  मेष राशी :- नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात आणि त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो. व्यवसायात असलेल्यांसाठीही हा चांगला काळ आहे, कारण प्रलंबित काम पुढे जाऊ शकते. हा महिना विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबात परस्पर समंजसपणा राहील आणि महिन्याच्या उत्तरार्धात आनंदाची संधी निर्माण होऊ शकते. आरोग्य चांगले राहील, परंतु कामाच्या दबावाने स्वतःला थकवू नका. वृषभ राशी  हा कठोर परिश्रमाचा महिना आहे. तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कारकिर्दीत फळ मिळेल आणि तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना हा काळ अनुकूल वाटेल. अभ्यासावरही लक्ष केंद्रित केले जाईल. पाहुणे वारंवार कुटुंबात येऊ शकतात, ज्यामुळे आनंददायी वातावरण निर्माण होईल. प्रेम जीवन देखील आनंददायी राहील, विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात. आरोग्य सामान्य राहील, परंतु सुरुवातीच्या काळात झोप आणि विश्रांतीकडे लक्ष द्या. मिथुन...
           राज्याच्या पहिल्या महिला                      उपमुख्यमंत्री!  सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ; कोणतं खातं मिळणार?       रा ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने पक्ष आणि सरकारमधील त्यांची जागा रिक्त झाली.   ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. त्यांनी राजभवनातील लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती.   तसेच सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रादी काँग्रेस पक...
डॉ. बबन बेलसरे यांना जीवन गौरव पुरस्कार    उद्या नागपुरात सन्मान         (प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे) अमरावती :  अमरावती शहरातील सामाजिक बांधिलकीचे सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायी डॉ. बबन बेलसरे यांना विदर्भस्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. •क्लिक करा, सविसतर वाचा ...  वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार शनिवार दि. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वा. नागपूर येथील रामदास पेठेतील सुप्रसिद्ध सेंट्रल पॉईंट हॉटेलच्या सभागृहात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर अतिथींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन एओआय व एच एन एस या संघटनांनी त्यांच्या विदर्भस्तरीय अधिवेशनामध्ये आयोजित केला आहे. डॉ. बबन बेलसरे यांचा वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात चांगला नावलौकिक असून ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या वीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा श्री प्रा. शाम मानव यांचे कार्यक्रम ते अमरावती शहरात आयोजित करीत आहेत. याशिवाय मिश...

आजच्या काळात, इतरांचा सतत विचार करणारे आणि माणुसकी जपणारे लोक समाजात क्वचितच पाहायला मिळतात. पण ज्येष्ठ पत्रकार आणि निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते दिनेशभैया शुक्ला यांच्याकडे पाहिल्यावर, आजही माणुसकी जिवंत आहे यावर विश्वास ठेवावा लागतो.

      मानवतेचे प्रतीक,       दिनेशभैया शुक्ला     आ जच्या काळात, इतरांचा सतत विचार करणारे आणि माणुसकी जपणारे लोक समाजात क्वचितच पाहायला मिळतात. पण ज्येष्ठ पत्रकार आणि निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते दिनेशभैया शुक्ला यांच्याकडे पाहिल्यावर, आजही माणुसकी जिवंत आहे यावर विश्वास ठेवावा लागतो. स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता, भैया सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण ऊर्जेने लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. ते आपल्या आप्तस्वकीयांसाठी कोणत्याही वेळी धावून जाणारे व्यक्तिमत्त्व आहेत; त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने याचा अनुभव घेतला आहे. माणसांप्रमाणेच मुक्या जनावरांबद्दल आणि पक्ष्यांबद्दलची त्यांची संवेदनशीलता अतुलनीय आहे. जेव्हा घरातील मांजरीच्या पिल्लाला बकरीने जखमी केले होते, तेव्हा त्या चिमुकल्या जीवाला वाचवण्यासाठी भैयांची झालेली तळमळ आम्ही पाहिली आहे. त्या पिल्लावर उपचार करण्यासाठी वर्ध्यापर्यंत पाठवून त्यांनी केलेली व्यवस्था, त्यांची करुणा दर्शवते. ते केवळ स्वतःचाच विचार करत नाहीत, तर ज्यांना ते आपले धाकटे भाऊ मानतात, त्या सर्वांच्या भल्...

आजचे राशिभविष्य शनिवार, दि.३१ जानेवारी २०२६

  आजचे राशिभविष्य  शनिवार, दि.३१ जानेवारी २०२६   विक्रम संवत 2082, शक संवत 1947 (विश्ववसु संवत्सरा), माघ  त्रयोदशी तिथी सकाळी 08:25 पर्यंत, त्यानंतर चतुर्दशी तिथी पहाटे 05:52 पर्यंत, त्यानंतर पौर्णिमा नक्षत्र पुनर्वसु सकाळी 01:34 पर्यंत, त्यानंतर पुष्य दुपारी 01:33 पर्यंत विश्वकुंभ योग, त्यानंतर प्रीति योग करण तैतिल सकाळी 08:26 पर्यंत, त्यानंतर गार नंतर 07:07 पर्यंत, त्यानंतर वणीज 05:53 पर्यंत, त्यानंतर विष्टी.      ०००००००००००००००००००००० मेष राशी  :- कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असतील. वादविवाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवन आनंदी होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमचे प्रेम जीवन प्रेम आणि आपुलकीने भरलेले असेल. नवीन सकारात्मक बदलांसाठी तयार रहा. वृषभ राशी :- तुमच्या प्रेम जीवनात नवीन उत्साह निर्माण होईल. अविवाहित व्यक्ती एखाद्या मनोरंजक व्यक्तीला भेटतील, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. नवीन आश्चर्यांसाठी तयार राहा. तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. कामाचा जास्त ताण टाळा. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसाय...

महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मोठी बातमी!  सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री •रा जकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. •क्लिक करा, सविस्तर वाचा ...  महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.  उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्या आता उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुज...
राष्ट्रसंतांच्या सहवासात  पद्मश्री श्री जनार्दन बोथे                     लेखक                   डाॅ. रामदास चवरे                   पुणे .                   संवाद : 8308998672         अ खिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दनपंत बोथे यांना केंद्र शासनाने नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्यानिमित्त यवतमाळच्या सुप्रसिद्ध दाते कॉलेजचे माजी प्राचार्य व मराठीतील सुप्रसिद्ध लेखक डॉ.रामदास चवरे यांनी काही वर्षांपूर्वी त्यांची घेतलेली मुलाखत या ठिकाणी आम्ही रसिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देत आहोत. (1) आपण राष्ट्रसंतांच्या सहवासात कसे आणि केव्हापासून आलात? गोगरी (जि. वाशिम) हे माझे जन्मगाव. तेथे वंदनीय राष्ट्रसंताचे आगमन झाले होते. मी तेव्हा दहा बारा वर्षांचा असेल. स्वभावात बालसदृश खोडकर वृत्ती होती. त्यानुसार राष्ट्रसंतांशी वागलो. ते प्रसन्नपणे हसलेत. मला ज...
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही  आ.रणधीर सावरकर यांचे प्रतिपादन •अकोला :  अकोला महानगरीच्या नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.  विकास हे सूत्र कायम  लक्षात घेऊन जात-पात धर्म न पाहता शहराचा सर्वांगीण विकास सर्व स्पर्शी विकास हे एकमेव लक्ष घेऊन शहर सुधार आघाडी काम करेल, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.          अनेक कार्यकर्ते कमी मताने पराभूत झालेत.  त्यांनी हताश न होता सामाजिक उपक्रम राबवून पक्षाचा आणि स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा काम करावं तसेच पक्ष ही आपली आई आहे, पक्षाची  भूमिका तसेच पक्षाने घेतलेला निर्णय याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.  पक्ष हा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवत असतो.   त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या उद्देशाने पक्षाच्या पाठीशी उभे राहावे,  अशी विनंती आमदार सावरकर यांनी केली.           पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांचा सन्मान केल्या जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. हा विजय अकोल्यातील जनतेला आणि देवेंद्र फडणवीस यां...
   भाजपाची चाल फळाला आली!    महापाैरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड • अकोला :  अकोला महापालिकेत काँग्रेसने महापौर पदाचा आधी दावा केला होता. परंतु तो फोल ठरला आहे. बहुमत मिळालेले नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे.  या महापालिकीसाठी महापाैर पदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता १५ दिवसानंतर राज्यातील २९ पैकी महापालिकांपैकी पहिला महापौर ठरला असून, इतर महापालिकांचे महापौर देखील लवकरच ठरणार आहेत.   राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडून १५ दिवस उलटून गेले तरी महापौर पदावरून रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच महापौर पदाबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. त्यानंतर आता वेगवेगळ्या महापालिकेसाठी महापौर निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अकोला महापालिकेत महापौर म्हणून शारदा खेडकर यांची निवड झाली असून, त्या प्रभाग क्रमांक १५ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.   ८० जागा असेलेल्या अकोला महापालिकेची निवडणूक मोठ्या अटीतटीची झाली. कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही....