मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केंद्र शासनाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक !

•   केंद्र शासनाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक ! •  भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी  अकोला :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानेतृत्वाखाली आठव्यांदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करून विक्रम केला असून, शेतकरी, सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक, मातृशक्ती, व्यापारी, मच्छीमार कामगार, नोकरदार, तसेचरोजगार निर्मिती करणारे, कॅन्सरसारख्या औषधी, विकासासोबत इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त करणारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला सामाजिक दायित्व लक्षात घेऊन सामाजिक समरसतासोबत आर्थिक व सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया तोयांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या अनेक रेल्वे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देऊन वेगवेगळ्या योजना सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना रोजगार निर्मिती करणारा तसेच समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उंचावणारा अर्थसंकल्प असल्याचेही गिरीश जोशी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, कामगारांना व सर्व समाजाला समर्पित असल्...

अकोला मनपाचे सुनील गोहर

 अकोला मनपाचे सुनील गोहर यांची प्रयाराज महाकुंभमेळ्यात स्वच्छता जनजागृती अकोला :  स्वच्छता, व्यसनमुक्ती विविध अभियानाव्दारे सामाजिक संदेश देणारे सामाजिक कार्यकर्ते अकोला मनपाचे स्वच्छतादूत सुनील गोहर यांनी थेट प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात दाखल होऊन महाकुंभसुंदर व स्वच्छ ठेवण्यात सहयोग देण्यात बाबत आवाहन केले. प्रयागराज त्रिवेणी संगम घाट येथे हातत फलक घेऊन स्वच्छता जनजागृती अभियान राबविले.  महाकुंभमेळ्यात गोहर यांच्या स्वच्छता जनजागृतीच्या कार्याची दखल घेत, प्रयागराजचे महापौर गणेश केसवानी यांनी स्वच्छता दुत पुरस्कार प्रदान करून गौरव केला. यावेळी स्थानिक पदाधिकारी, अधिकारीवर्गाची उपस्थिती होती. प्रयागराज संगम येथील बचाव कार्यातही सहभाग घेतला. गोहरे यांनी विविध सामाजिक कार्य, धार्मिक सोहळ्यात स्वच्छता जनजागृती, वृक्ष, जल, पक्ष बचाव कार्यात सहभागी होतात. तसेच व्यसनमुक्ती, शैक्षणीक, राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग घेतात. महाकुंभमेळ्या देशभरातून तसेच विदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानाकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. यावेळी त्यांच्या समवेत श...

रेशीम शेती उद्योग कार्यशाळा

 •   प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत  रेशीम शेती उद्योग कार्यशाळा  अकोला :  रेशीम शेती उद्योग हा कृषी संलग्नित रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा तसेच परकीय चलन उपलब्ध करणारा कमी कालावधीत अधिक लाभ मिळवून देणारा उद्योग आहे.  महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पूरक असून सध्याच्या वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी या उद्योगाची शेतकऱ्यांना हमखास मदत होऊ शकते. या आधारावरच स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र  विभाग जिल्हा रेशीम कार्यालय व प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन  दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.        कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष म्हणून पितृ संस्थेच्या अध्यक्षा डॉ.तारा हातवळणे , प्राचार्य डॉ.जगदीश साबू प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रिया खिल्लारे कार्यक्रम समन्वयक डॉ.मिलिंद शिरभाते सह समन्वयक डॉ. निशा वराडे उ...

कादंबरीकार सूर्यबाला यांना 'व्यास सन्मान'

 •   कादंबरीकार सूर्यबाला यांना 'व्यास सन्मान' •   डॉ.पूनम मानकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन अकोला : प्रसिद्ध कथाकार सूर्यबाला यांना 'कौन देश को वसी वेणू की डायरी' या कादंबरीसाठी चौतीसावा 'व्यास सन्मान' प्रदान करण्यात आला.  मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ सचदेव आणि ज्येष्ठ कथाकार डॉ.दामोदर खडसे यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला.  यावेळी डॉ. पूनम मानकर पिसे लिखित सूर्यबाला : अ लाइट ऑफ सेन्सेशन या सूर्यबालाच्या सर्जनशीलतेवर प्रकाश टाकणारे पुस्तक आणि ‘शब्द सृष्टी’ मासिकाच्या सूर्यबाला विशेषांकाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  'कौन देश को: वेणू की डायरी' या विषयावर चर्चा करताना विश्वनाथ सचदेव म्हणाले की, सूर्यबाला यांनी आपल्या प्रदीर्घ कथानक प्रवासात भारतीय समाजाचे सत्य मांडले आहे.  डॉ.दामोदर खडसे म्हणाले की, आजच्या तथाकथित महिला प्रवचनात सूर्यबाला कोणत्याही धामधुमीशिवाय स्त्री जीवनातील सकारात्मक पैलू मांडत आहेत.  प्रा.सुरेश ऋतुपर्णा यांनी पुरस्कारप्राप्त कादंबरी हे महाकाव्य असल्याचे सांगून सांगितले की...

कापूर कोणत्या वनस्पती पासून बनतो ?

  कापूर कोणत्या वनस्पती पासून बनतो ? माचिसची काडी पेटवल्या बरोबर कापूर जळू लागतो आणि एक आल्हादायक सुगंध पसरतो.  कापूर हा विशिष्ट झाडांपासून मिळणारा मेणासारखा पांढरा किंवा पारदर्शक पदार्थ आहे.   ज्वलनशील आहे आणि त्याला तीव्र वास आहे. कापूर कसा बनवला जातो, ती कोणत्या प्रकारचे वनस्पती आहे आणि ते इतके ज्वलनशील का आहे याचा कधी विचार केला आहे का?        बाजारात दोन प्रकारचे कापूर उपलब्ध आहेत.  एक नैसर्गिक कापूर (भीमसेनी कापूर) आणि दुसरा कृत्रिमरित्या कारखान्यात तयार केला जातो.  नैसर्गिक कापूर एका झाडापासून बनवला जातो, जो कापूरच्या झाडापासून बनवला जातो.  त्याचे वैज्ञानिक नाव 'सिनामोमम कॅम्फोरा' आहे. कापूरच्या झाडाची उंची ५०-६० फुट पर्यंत असते आणि त्याची गोल आकाराची पाने ४ इंच रुंद असतात.   या झाडाच्या सालापासून कापूर तयार केला जातो.   जेव्हा कापूरची साल सुकायला लागते किंवा राखाडी रंगाची दिसू लागते, तेव्हा ती झाडापासून वेगळी केली जाते. नंतर गरम केल्यानंतर ते रिफाईंड करून पावडर बनविली जाते.        ...

मिशन आयएएसतर्फे ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा

 मिशन आयएएसतर्फे ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर  अमरावती :  स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमीच्या मिशन आयएएस  तर्फे येत्या उन्हाळ्यात 10 मे ते 16 मे यादरम्यान अमरावती येथे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरासाठी 10 ते 20 हा वयोगट ठरविण्यात आला आहे. या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय व्यक्तिमत्व विकास मुलाखत तंत्र सराव परीक्षा याबाबत तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत .यामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मिशन आय ए एसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आयएएसच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.       हे वर्ष मिशन आयएएसचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आतापर्यंत मिशन आयएएसच्या अशा प्रकारच्या शिबिराला गेल्या पंचवीस वर्षात जवळपास 273 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. या शिबिराला महाराष्ट्रातील नामवंत आयएएस अध...