मुख्य सामग्रीवर वगळा

रेशीम शेती उद्योग कार्यशाळा

 •   प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत 

रेशीम शेती उद्योग कार्यशाळा 



अकोला : 

रेशीम शेती उद्योग हा कृषी संलग्नित रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा तसेच परकीय चलन उपलब्ध करणारा कमी कालावधीत अधिक लाभ मिळवून देणारा उद्योग आहे.  महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पूरक असून सध्याच्या वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी या उद्योगाची शेतकऱ्यांना हमखास मदत होऊ शकते. या आधारावरच स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र  विभाग जिल्हा रेशीम कार्यालय व प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन  दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

       कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष म्हणून पितृ संस्थेच्या अध्यक्षा डॉ.तारा हातवळणे , प्राचार्य डॉ.जगदीश साबू प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रिया खिल्लारे कार्यक्रम समन्वयक डॉ.मिलिंद शिरभाते सह समन्वयक डॉ. निशा वराडे उपस्थित होते.                        कार्यशाळेचे बीज भाषण श्री हेमंत लाडगावकर असिस्टंट डायरेक्टर रिजनल सेरिकल्चर ऑफिस अमरावती यांनी केले. मलबेरी नर्सरी कल्टिवेशन मलबेरी प्लांटेशन सिल्क रियरींग ककुन हार्वेस्टिंग ग्रेडिंग अँड मार्केटिंग या विषयावर विद्यार्थ्यांनी रेशीम उद्योग कशा तऱ्हेने शेतकऱ्याला उत्तम लाभाचे स्त्रोत आहे हे पटवून सांगितले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री एस पी फडके जिल्हा रेशीम उत्पादक अधिकारी वाशिम यांनी तुतीची लागवड व रेशीम उद्योगामुळे शेतकऱ्यापर्यंत शेतीला पूरक असा जोडधंदा प्राप्त होऊन इतर पारंपारिक पिकाच्या तुलनेत अधिक उत्पादन कसे मिळू शकते  व त्याचबरोबर ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर अल्पभूधारक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार व महिलांना ग्रामीण भागातच रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होऊ शकते यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ.श्रीकांत आहेरकर असोसिएट  प्रोफेसर ऑफ  एंटोमोलोजी (माजी) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला  यांनी रेशीम उद्योग करताना कीडनियंत्रण व इतर प्रकारची रोग हे नष्ट कसे करता येईल यावर प्रकाश टाकला. पुढील सत्रात डॉ.रश्मी जोशी सावलकर सहाय्यक प्राध्यापक आर एल टी महाविद्यालय अकोला यांनी रिलिंग व ट्विस्टिंग करायचे तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन केले. श्री सुनील मानकर असिस्टंट जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय अकोला यांनी ककुन हार्वेस्टिंग या विषयावर शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील वातावरण रेशीम उद्योगास पोषक असल्याचे दिसून आल्यामुळे तसेच रेशीम उद्योगाचा विकास करण्यात राज्याचा मोठ्या प्रमाणावर भाव असल्याने शासनाने रेशीम उद्योगाचा सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्यासाठी 1997 पासून वस्त्रोद्योग विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली रेशीम संचालनालयाची स्थापना करण्यात आली असून रेशीम उद्योग विकासाची जबाबदारी संचालनालयाकडे आहे असे मत कार्यशाळेत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निशा वराडे, प्रस्ताविक डॉ.मिलिंद शिरभाते  तथा आभार प्रदर्शन डॉ.प्रिया खिल्लारे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी पार पडण्याकरिता श्री दिनेश बनसोड तसेच सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी प्रयत्न केले . कार्यशाळेचे प्रात्यक्षिक शिरला अंधारे येथील शेतामध्ये घेण्यात येणार असून वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा शिरला अंधारे येथे येऊन उपभोग घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...