• डॉ.संदिप चव्हाण यांची आरोग्यगाथा
• उमेद, ऊर्जा आणि उपचार
: लेखक :
• प्रविण शकुंतलाई बाबुलालजी हटकर
Mob. 80552 13281
डॉ.संदिप चव्हाण — हे नाव उच्चारलं की डोळ्या समोर येतो एक तेजस्वी चेहरा, डोळ्यात करुणा, हृदयात माणुसकी, आणि कार्यात अविरत झोकून देणं. त्यांनी निवडलेली वाट सोपी नव्हती. एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य व्यक्तिमत्वाचा प्रवास प्रारंभ करून खाचखळग्यांनी भरलेली, संघर्षांनी सजलेली वाट तुडवत जाणं आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करणं निश्चितच सोपं नाही ... पण त्यांनी हार मानली नाही. कारण...
अंधारल्या वाटा
तेजोमय होती ।
संदिप चालती
जी जी वाट ।।
जिथे अंधार होता, तिथे त्यांनी आशेचा दिवा लावला. जिथे भय होतं, तिथे विश्वासाचं पाणी शिंपडलं. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी केवळ उपचार केले नाहीत, तर हजारो - लाखो माणसांना आयुष्याची नवी दिशा दिली जगण्याची... कुणाल औषधीच्या तर कुणाला मार्गदर्शनाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात जेव्हा साऱ्या जगाने भीतीच्या सावटाखाली डोळे मिटले होते, तेव्हा डॉ.चव्हाण सरांनी जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक भागामध्ये अंदाजे 3,50,000 लोकांपर्यंत मोफत आर्सेनिक होमिओपॅथीक औषध पोहोचवलं. हे फक्त एक वैद्यकीय अभियान नव्हतं – ही होती श्रद्धा, सेवा आणि शुद्ध माणुसकीची पूजा !आणि ते नुसते होमिओपॅथी पुरतेच मर्यादित नाहीत तर ते लहानांन पासन थोरा मोठ्या पर्यंत बैठक असणारे, साहित्यिकांच्या मांदियाळीत सहज मिसळतात, सांस्कृतिक कार्यक्रमांत रंग भरतात, आणि सामाजिक चळवळीत आपले खांदे सहज उभे करतात जबाबदारी पेलण्याकरिता तसेच उद्याच्या समाज हिताकरिता राजकारणाच्या चर्चांमध्येही त्यांचं आकलन अगदी अचूक सडेतोड आणि स्पष्ट असतं – पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एकच प्रेरणा, एकच उद्देश –ते म्हणजे समाजहित!आजच्या घडीला त्यांनी केनवड ( जिल्हा - वाशिम) आणि शिवर, पाटखेड, माझोड ( जिल्हा -अकोला) यासारखी अनेक गावे आरोग्य सेवेकरिता दत्तक घेतली आहेत ही केवळ सेवा नाही – ही त्या गावांच्या वेदनांशी एकरूप होण्याची त्यांची तयारी आहे, सोबतच जिल्ह्यातील गजानन महाराज संस्थान शिवर असो वा लॉयन्स क्लब इंटरनॅशनल, इंडियन रेड क्रॉस सोसायटी सारख्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थां असो यांच्या माध्यमातून केवळ सामाजिक सेवेच्या भावनेतून ते सदैव तत्पर असतात याचा देखील अनेक वेळा आपण अनुभव घेतच आहोत त्यांचं सातत्याने वाचन, चिंतन, आत्मपरीक्षण आणि नव्याला आकलन करून नवीन काहीतरी शिकण्याची उमेद – ही त्यांची खरी ओळख आहे.
ते विद्यार्थ्यांना केवळ करिअरचा सल्ला देत नाहीत, तर त्यांच्या स्वप्नांना विश्वासरुपी पंख देऊन जीवन जगण्याची नवीन दिशा देतात. आरोग्यावर बोलू काही” या त्यांच्या कार्यक्रमातून ते जनतेच्या आरोग्यविषयक प्रश्नांना एक सखोल आणि प्रेमळ उत्तर देतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर योग्य प्रकाश टाकताना, विज्ञान आणि अध्यात्म यांचा संतुलित संगम त्यांच्या जीवनशैलीतून निश्चितच जाणवतो – कारण ते केवळ शरीर नाही, तर मनावर उपचार देतात. डॉ.संदिप चव्हाण हे केवळ एक वैद्यकीय तज्ञच नाहीत तर, ते एक प्रेरणा आहेत,एक चैतन्याचा प्रवाह,आणि समाजातील युवकांकरिता एक आदर्श ! ( लेखक हे अभिनेता, दिग्दर्शक, अभंगकार आहेत.)
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा