मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संपूर्ण भारतात 200 कोटीचे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारून व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून फक्त एक रुपयामध्ये राहणे जेवणे व प्रशिक्षण या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या व या उपक्रमामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय कुणबी महासभेचे 46 वे राष्ट्रीय अधिवेशन...

जबलपूरला कुणबी समाजाचे  4 व 5 ला राष्ट्रीय अधिवेशन           (प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे) सं पूर्ण भारतात 200 कोटीचे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारून व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून फक्त एक रुपयामध्ये राहणे जेवणे व प्रशिक्षण या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या व या उपक्रमामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय कुणबी महासभेचे 46 वे राष्ट्रीय अधिवेशन उत्तर प्रदेशचे सुप्रसिद्ध सेवानिवृत्त आयएएस अधिकारी श्री निरंजन यांच्या अध्यक्षतेखाली व राजपत्रित अधिकारी श्री एल पी पटेल मार्गदर्शनाखाली येत्या ४ व ५ तारखेला जबलपूर येथे होत आहे.    ‌    भारतातल्या सर्व राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय कुणबी महासभेच्या या येत्या ४ व ५ एप्रिलला मध्य प्रदेशातील जबलपूर येथे होणाऱ्या या अधिवेशनाला संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.     ‌   या अधिवेशनामध्ये मराठा देशमुख कुणबी या जातीमधील पोटजातीमधील सर्व कुणबी बांधव सहभागी होऊ शकतात. बाहेर गा...

मासिक राशिभविष्य, माहे एप्रिल २०२६

(माहे एप्रिल २०२६ ) (बुधवार,दि.१ ते गुरुवार,दि.३० एप्रिल २०२६) . ०००००००००००००००००००००० सर्व प्रकारच्या पूजा व वास्तू व ज्योतिष शास्त्र विषयक माहिती साठी संपर्क    पंडित  श्री व्यंकटेश देशपांडे          (गुरुजी) संवाद :  7499121664,            9881601459. ०००००००००००००००००००००० मासिक राशिभविष्य (माहे एप्रिल २०२६ ) मेष राशी :- तुमच्या कामासाठी आणि संवाद कौशल्यासाठी तुम्हाला ओळख मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, मित्र किंवा सहकाऱ्याबद्दलच्या भावना वाढू शकतात. नात्यांमध्ये काही दुरावा किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शांत राहणे महत्त्वाचे आहे. महिन्याच्या अखेरीस, तुमच्या जोडीदारासोबत तुमचे चांगले संवाद होतील, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तुमचे आरोग्यही चांगले राहील. वृषभ राशी :- या महिन्यात काही लोक तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध रहा. वैयक्तिक आयुष्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक किंवा आध्यात्मिक बाबींमध्ये व...

आजचे राशीभविष्य, मंगळवार दि. ३१ मार्च २०२६

मंगळवार,दि. ३१ मार्च २०२६   . ०००००००००००००००००००००० सर्व प्रकारच्या पूजा व वास्तू व ज्योतिष शास्त्र विषयक माहिती साठी संपर्क    पंडित  श्री व्यंकटेश देशपांडे          (गुरुजी) संवाद :  7499121664,            9881601459. ०००००००००००००००००००००० आजचे राशिभविष्य  (मंगळवार,दि. ३१ मार्च २०२६  ) मेष राशी भविष्य अतिखाणे आणि उच्च कॅलरी आहार टाळणे गरजेचे आहे. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते. ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात परंतु, या वेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल. वृषभ राशी भविष्य गरज नसलेले को...
      जिल्हाधिकाऱ्यांची गॅस        एजन्सीला भेट, ग्राहकांशी       संवाद  गॅस वितरणाचा दैनंदिन आढावा, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन • अकोला , दि. ३० (जिमाका)  : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी  गॅस एजन्सीला भेट देऊन गॅस सिलेंडर वितरणाचा आढावा घेतला. नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पेट्रोलियम कंपन्यांशी दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.         ;जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. एचपी अकोला गॅस एजन्सी तसेच मालीवाल भारत गॅस एजन्सी येथे भेट देऊन वितरणाबाबत आढावा घेण्यात आला. घरगुती गॅसचा तुटवडा नसून ग्राहकांची केवायसी सुध्दा होत आहे.          गॅस एजन्सीमध्ये गॅस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांसोबत जिल्हाधिका-यांनी संवाद साधला. नागरिकांच्या गॅस सिलेंडर वितरणाबाबत विचारणा करण्यात आली. गॅस सिलेंडर वेळ...

माझा अनूभव

तप, सेवा, सुमिरण या पद्धतीने आरोग्यदायी जीवन कसे जगायचे?            माझा अनूभव       आमचा तप, सेवा, सुमिरण या पद्धतीने आरोग्यदायी जीवन कसे जगायचे? या वरील अनुभव.  मी भास्कर जामकर. रेणुका नगर, डाबकी रोड अकोला. मला शुगर आणि बी. पी. चा अतिशय त्रास होता. माझी शुगर 350,तर बी पी सुद्धा 250पर्यंत राहत असे.          रात्रीच दवाखान्यात जावे लागत असे. 2500रु. चा दरमहा खर्च होता.          कंटाळून गेला होता जीव. एक दिवस शेगाव वारी करून आलो. एका वृत्तपत्रात डाॅ. सुरेश गाडगे काकांच्या lecture ची जाहिरात वाचली. लगेच ऐकायला गेलो.          आदरणीय काकांसोबत संपर्क करुन त्यांनी सांगितल्यानुसार   तप, सेवा, सुमिरण या पद्धतीने जीवन कसे जगायचे  याचा सातत्याने त्यांनी  माझ्याकडून अभ्यास करून घेतला. सराव करून घेतला. तिकडून आल्यावर काकांच्या सांगण्याप्रमाणे तप, सेवा, सुमिरण प्रणालीचा अवलंब दररोजच्या जीवनात केला. काय आश्चर्य... सातत्य आणि सरावाने मी आज एकदम ठणठणीत आहे. त...

कलिंगड खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका. -फ्रीजमध्ये खूप वेळ कापून ठेवलेले कलिंगड खाऊ नका.

उन्हाळ्यात कलिंगडाचे खाण्याचे फायदे 🍉 उ न्हाळ्यात कलिंगड खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामध्ये पाण्याचे प्रमाण सुमारे 92% असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. कलिंगड खाण्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत.                         🍉 आरोग्यदायी फायदे       हायड्रेशन (पाणीपुरवठा): कडाक्याच्या उन्हात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. कलिंगड खाल्ल्याने शरीर नैसर्गिकरित्या हायड्रेटेड राहते.        पचन सुधारते: यामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.         त्वचेसाठी उत्तम: कलिंगडमधील 'व्हिटॅमिन ए' आणि 'व्हिटॅमिन सी' त्वचेला चमकदार ठेवण्यास आणि उन्हामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात.         हृदयाचे आरोग्य यामध्ये असलेले 'लायकोपीन' हे अँटीऑक्सिडंट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.        म...

आजचे राशिभविष्य, सोमवार, दि.३० मार्च २०२६

सोमवार,दि. ३० मार्च २०२६   . विक्रम संवत 2083, शक संवत 1948 (परभाव संवत्सरा), चैत्र द्वादशी तिथी सकाळी 07:09 पर्यंत, त्यानंतर त्रयोदशी नक्षत्र मघा दुपारी 02:47 पर्यंत, त्यानंतर पूर्वा फाल्गुनी दुपारी 04:51 पर्यंत शूल योग, त्यानंतर गंड योग करण बलव सकाळी 07:10 पर्यंत, त्यानंतर कौलव 07:00 PM पर्यंत, त्यानंतर तैतिल. ०००००००००००००००००००००० सर्व प्रकारच्या पूजा व वास्तू व ज्योतिष शास्त्र विषयक माहिती साठी संपर्क    पंडित  श्री व्यंकटेश देशपांडे          (गुरुजी) संवाद :  7499121664,                  9881601459. ०००००००००००००००००००००० आजचे राशिभविष्य  (शनिवार,दि.२८ मार्च २०२६  ) मेष राशी :-  व्यावसायिक दौऱ्यावर जाऊ शकता. वैवाहिक प्रेम देखील दिसून येईल आणि तुमचा जोडीदार तुम्हाला मालमत्ता खरेदी करण्यास सांगू शकतो. वृषभ राशी :- आज कोणत्याही गोष्टीबद्दल अतिआत्मविश्वास बाळगू नका. कामाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. विवाहित जोडप्यांना काही प्रमाणात वाढलेला तणाव जाणवू शकतो. मिथ...
        किनखेडपूर्णा  रस्त्यालगतच्या ऑप्रोच रस्त्यांचे भूमिपूजन  आ. रणधीर  सावरकरांच्या हस्ते संपन्न      अकोला : अठरा गावांना जोडणारा तसेच महत्त्वाचा  ३१ अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील दहीहंडा फाटा ते दहीहंडापर्यंत होत असलेल्या मुख्य रस्त्यावरील किनखेड पूर्णा येथील गावातील मुख्य रस्त्यालगतचे ऑप्रोच रस्त्यांचे भूमिपूजन आ. रणधीर  सावरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.          दळणवळणाची सोय होऊन शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेमध्ये उपलब्ध व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोय व्हावी, अकोला आणि अकोट अमरावती या भागातील जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता हा विकासाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर  होते. राजेश नागमते, विठ्ठल वाकोडे, सरपंच ओईंबे ताई, रमेश वानखडे, विवेक भरणे, ज्ञानेश्वर झांबरे, अनिल इंगळे, नितीन गोंडचवर, विनोद मंगळे, बाबुराव इंगळे, बळीराम इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, रामदास नवघर...

प्राध्यापक वाकुडकर यांच्या बहारदार प्रेम कवितांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.

  'लोकरंग'च्या सखे साजणी कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद स्नेहभोजनाने झाली समारंभाची सांगता अकोला: गेल्या वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अकोलेकरांना देणाऱ्या 'लोकरंग ' प्रतिष्ठान द्वारा आयोजित 'सखे साजणी' या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला.  प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांच्या बहारदार प्रेम कवितांनी रसिकांना चिंब केले... स्नेहभोजनाने या समारंभाची सांगता झाली.           वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या लोकरंग परिवारातर्फे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आतापर्यंत करण्यात आले. सर्वप्रथम मधुरा वेलणकर यांचा ' मधुरव', त्यानंतर स्थानिक कलावंत सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांचा सार गाव मामाचं..., समीर चौगुले यांचा सम्या सम्या मैफिलीत माझ्या आणि गेल्याच महिन्यात सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा अभिनय असलेले 'शिकायला गेलो एक...' या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.         शनिवारी या वर्षातील शेवटचा कार्यक्रम सखे साजणी हा सादर करण्यात आला. लोकरंग चे सदस्य सहपरिवार या समारंभाला उपस्थित होत...
    ईश्वरी कृपा प्राप्तीसाठी अंतःकरणापासून भक्तीची गरज : हभप अंजली भगवंत अनवाणे  अकोला : बार्शिटाकळी तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान कोथळी बुद्रुक येथे  भागवत आणि कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात  दि. २८ मार्च रोजी अकोला येथील युवा कीर्तनकार हभप कुमारी अंजलीताई अनवाणे यांचे कीर्तन झाले. या कीर्तनात त्यांनी प्रामाणिकपणे आणि अंतःकरणा पासून ईश्वराची आराधना केली, तर ईश्वर भक्ताची ईच्छा पूर्ण करतो,असे सांगितले.          विजय नगरचा राजा रामदेवराय याने पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती पंढरपुरातील लोकांवर दबाव टाकून विजयनगर येथे नेली. परंतु पांडुरंगाचे परमभक्त श्री भानुदास महाराज यांनी विजयनगर येथे जाऊन पांडुरंगाचीची मनोभावे प्रार्थना केली. त्यामुळे पांडुरंगाने राजा रामदेवराय याचे मत परिवर्तन केले.         आणि श्री भानुदासानीं पांडुरंगाची मूर्ती पंढरपुर येथे परत आणली, अशाप्रकारे  ईश्वर केवळ निःस्वार्थ भक्तीचा भुकेला असून त्याला इतर कोणत्याही मार्गाने प्रसन्न करता येत नाही, असा संदे...

•रविवारी प्रसिद्ध होणारा स्तंभ:-

                   कवडसा         प्रा डॉ मोहन खडसे, अकोला             संवाद : 9823289010 ईमेल:  mvkhadse9@gmail.com "रस्ता महत्त्वाचाच...... .."       मा णसाचं मन कसं आहे, याचं वर्णन अनेक लेखकांनी केलं आहे ,संतांनी केलं आहे. त्यात  फक्त वर्णन नाही, ते वर्णन प्रत्येकाला असं वाटतं -  हे माझंच आहे .याचं कारण आहे, ते वर्णन अगदी माणसाच्या मनाशी जुळणारं आहे. एकरूप होणार आहे. महाराष्ट्रभर नव्हे भारतभर गाजलेल्या आणि दमदार लेखनाने माणसाच्या ओठांवर असणाऱ्या ,खानदेशी कवयत्री बहिणाबाई चौधरी यांनी माणसाच्या मनाचे वर्णन केले आहे ते अगदी नेमकं आहे- ' मन वढाय वढाय जसा शेतातलं ढोर ' शेतात जसं एखादा प्राणी असतो, ढोर असतो त्याला कळत नाही , हे खाऊ की ते खाऊ ! त्याला काही नेमकं सुचत नाही तसेच माणसाच्या मनाचं असतं का ? एका क्षणात इथे दुसरा क्षणात तिथे असं माणसाचं मन हे वाऱ्यावर फिरत असतं. त्याला वेग असतो. त्याला मर्यादा नसते विचारांची, कधीची कशाचीही ! नेमकं नाव नक्की केलं ते ...