मुख्य सामग्रीवर वगळा

•रविवारी प्रसिद्ध होणारा स्तंभ:-

                  कवडसा 
      प्रा डॉ मोहन खडसे,अकोला 
         संवाद : 9823289010
ईमेल: mvkhadse9@gmail.com

"रस्ता महत्त्वाचाच...... .."

      माणसाचं मन कसं आहे, याचं वर्णन अनेक लेखकांनी केलं आहे ,संतांनी केलं आहे. त्यात  फक्त वर्णन नाही, ते वर्णन प्रत्येकाला असं वाटतं -  हे माझंच आहे .याचं कारण आहे, ते वर्णन अगदी माणसाच्या मनाशी जुळणारं आहे. एकरूप होणार आहे. महाराष्ट्रभर नव्हे भारतभर गाजलेल्या आणि दमदार लेखनाने माणसाच्या ओठांवर असणाऱ्या ,खानदेशी कवयत्री बहिणाबाई चौधरी यांनी माणसाच्या मनाचे वर्णन केले आहे ते अगदी नेमकं आहे- ' मन वढाय वढाय जसा शेतातलं ढोर ' शेतात जसं एखादा प्राणी असतो, ढोर असतो त्याला कळत नाही , हे खाऊ की ते खाऊ ! त्याला काही नेमकं सुचत नाही तसेच माणसाच्या मनाचं असतं का ? एका क्षणात इथे दुसरा क्षणात तिथे असं माणसाचं मन हे वाऱ्यावर फिरत असतं. त्याला वेग असतो. त्याला मर्यादा नसते विचारांची, कधीची कशाचीही ! नेमकं नाव नक्की केलं ते वऱ्हाडी बोलीचे अभ्यासक आणि मराठीचे  लेखक डॉ. रावसाहेब काळे यांनी !  महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे ते सर्वत्र नावाजलेले लोकप्रिय कवी डॉ. विठ्ठल वाघ त्यांच्या एका कवितेत म्हणतात - 

मधी वावरात आंबा 
चारी मेरीनं कनसं
डेबुजी च्या कीर्तनात 
जसे डोलती मानसं...

कविता तशी वेगळी मात्र माणसाच्या मनाशी साधर्म राखणारी. ती अशी की जसं एखाद्या कीर्तनामध्ये माणसाचं मन रमतं, त्याची बुद्धी फारशी काम करत नाही .तो बुद्धीला दाद देऊ शकत नाही .तसंच माणसाच्या मनाचं होतं कारण बुद्धीनुसार तो काही करत नसतो तर मनाने करत असतो.डोलणं माणसाच्या हातात राहत नाही.
     बुद्धीने किंवा माणसाच्या मनाने त्याचा शरीराचं ,त्याच्या कार्याचा संचालन होतं असं म्हणतात. एक सत्य हे ही आहे की माणसाच्या मनात असलेली भीती ही ,त्याला कार्य करण्यास थांबवते किंवा अयशस्वी होऊ देते. खरंतर हे थांबविणे शक्य आहे कारण बुद्धी आणि मन यामध्ये जे वरचढ होईल त्यानुसार माणसांकडून कृती करण्यात येते आणि त्याचेच परिणाम माणसाला निश्चितपणे  मिळत असतात. मग कोणत्या वेळी मनाला हावी होऊ द्यावे हे माणसाला ठरवता येणे शक्य आहे, ठरवता येते त्याने विचार केला तरच ! एक तर खरं की मन आणि बुद्धी यामध्ये बुद्धीने घेतलेला निर्णय किंवा केलेली कृती ही निश्चितपणे अधिक चांगल्या परिणामाकडे नेणारी असते कारण मनाला असं वाटत असतं की अमुक व्हावं पण तसं होईल याची खात्री कुणाला आहे ? ज्याची खात्री आहे ते करायला काय हरकत आहे ? मन आणि बुद्धी यामध्ये मनात भावना असतात तर बुद्धीला व्यवहाराची, वास्तविकतेची जोड असते ज्याचं भान नेहमी ठेवणं अत्यंत गरजेचं असतं.
                  माणसाची बुद्धी ज्यावेळेला मन आणि मोह च्या ताब्यात जाते त्यावेळेला ती काम करेनाशी होते हे काय खरात या भोंदू बाबाच्या जाळ्यात  अडकलेल्या लोकांवरून लक्षात आलं नाही माणसांच्या ?
      माणसं त्यांच्या - त्यांच्या परिस्थितीने निर्णय घेतात हे खरं आहे मात्र त्यात बुद्धीचा वापर , हा निश्चितपणे झालाच पाहिजे यात शंकाच नाही. निर्णय कोणताही का असेना तो मनाने घ्यावा लागतो मात्र त्यावर वर्चस्व बुद्धीचं असलंच पाहिजे. एखादा निर्णय मनाने घेत असताना माणसाचा नाईलाज होऊ शकतो मात्र त्यांनी बुद्धीने विचार करावा की मी ही परिस्थिती पलटवून लागेल आणि याच परिस्थितीनुसार, मी नव्याने उभारणी करीन म्हणजे नक्कीच करेन ! परिस्थिती कोणतीही आणि कशीही असो त्यामध्ये सकारात्मक एकाग्रता म्हणतात ते अशाच विचार करण्याला ! खरंतर विचारांची सुरुवात व्हायला पाहिजे.यासाठीच की काय म्हणतात ना....

जो सफर की सुरूवात करते हैं
वो मंजिल भी पा लेते हैं
चलने का हौसेला रखना 
क्योंकी 
अच्छे इन्सानो का तो 
रास्ते भी इन्तजार करतें हैं.....

 (प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक ,शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन , अकोला च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...