मुख्य सामग्रीवर वगळा

यावेळी महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. संजय गरकल,महाव्यवस्थापक (विपणन) व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाकरे, प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुणी,श्री.यादव महा व्यवस्थापक वित्त यांच्यासह महाबीज मुख्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    महाबीज मुख्यालयात निनादले भक्तिगीतांचे सूर
     महाबीज मुख्यालयात          आषाढी महोत्सवानिमित्त        'भक्तिरंग’ कार्यक्रम


         ✍🏻अकोला : पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून भावभक्ती, समता, विज्ञानवादी विचारांचा संदेश देणारी वैश्विक ओळख आहे. संतांनी मांडलेले विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे जीवनात यश आणि समृद्धीची कापणी करायची असेल, तर भक्ती आणि सकारात्मक विचारांची पेरणी करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले.
       ते महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या मुख्यालयात आषाढी महोत्सवाच्या निमित्ताने 
पार पडलेल्या भक्तिरंग कार्यक्रमात बोलत होते..
        यावेळी महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. संजय गरकल,महाव्यवस्थापक (विपणन) व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाकरे, प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुणी,श्री.यादव महा व्यवस्थापक वित्त यांच्यासह महाबीज मुख्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
         श्री.स्वामी पुढे म्हणाले की, ज्याचा अंत आणि पार आजवर कुणालाही कळला नाही तो पंढरीचा पांडुरंग प्रत्येक भक्ताला आपल्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे वाटतो. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी पंढरीची वारी अनुभवली पाहिजे.
     महाबीजचे संचालक श्री.देशमुख  म्हणाले की,संतांच्या विचारांचा वारसा समाज कल्याणासाठी प्रेरणादायी असून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करणाऱ्या महाबीजसाठी ‘भक्तिरंग’सारखे सांस्कृतिक उपक्रम सकारात्मक ऊर्जा, सामाजिक बांधिलकी आणि मूल्यांची जपणूक करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतील.
       कार्यक्रमात गायक राजेश सोनोने,गायिका कविता वरघट यांच्या सुमधुर सुरात तबलावादक सागर म्हसाळ, कीबोर्ड स्वप्नील शिरसाट,आकटोपॅड वादक मनीष हुडेकर यांच्या संगीतमय साथीने माझे माहेर पंढरी,‘नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’, ‘शोधिसी मानवा’, ‘विठू माऊली तू माऊली जगाची’, ‘ऐरणीच्या देवा तुला’कानडा  राजा पंढरीचा, बाजे रे मुरलीया बाजे, माऊली  माऊली यांसह विविध भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले.भक्तिरसपूर्ण गीतांनी महाबीज मुख्यालयाचा परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमूनला.भक्तिरंग कार्यक्रमाचे संचलन प्रा.नाना भडकेयांनी,तर प्रास्ताविक श्री.गरकल यांनी केले.
०००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
 (P. R. O.)
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) 

 डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
संवाद : 9371854706
हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .
Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706
  _____________________________________


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...