मुख्य सामग्रीवर वगळा


"लोकशाहीचे वटवृक्ष : अण्णा हजारे"

                                    लेखक

                           गजानन हरणे,अकोला 

ण्णा हजारे... या नावाचा उच्चार झाला की डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक सनातन दीप. समाजहितासाठी अखंडपणे जळणारा, आत्मशक्तीच्या तेजात अंधाराला गिळणारा आणि लाखो-कोटी जनतेला जागरूकतेचा प्रकाश देणारा! आज या दीपज्योतीने ८८ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या जीवनाचा हा प्रवास म्हणजे नवभारताच्या आत्मशुद्धीचा एक मंत्रच जणू!



लोकशाहीच्या चैतन्यशक्तीला चालना देणाऱ्या अण्णा हजारे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना मन:पूर्वक अभिष्टचिंतन करताना माझे शब्द अल्प, पण भावना गगनापार आहेत.अण्णा, तुम्ही आम्हाला शिकवलं की देशासाठी झगडायचं असतं, सरकार विरोधात नव्हे, तर अन्याय विरोधात! पक्ष, जात, धर्म, भाषा, प्रांत या साऱ्या सीमारेषा ओलांडून, सत्याच्या मार्गावर चालत संपूर्ण देशासाठी झिजायचं असतं. तुम्ही उपोषणाच्या मार्गाने आम्हाला आंदोलनाचं बळ दिलंत. संविधानात लोकशाहीचा आत्मा आहे आणि त्या आत्म्याची खरी अभिव्यक्ती "जनता हीच मालक" या तत्त्वात आहे, हे शिकवणारे तुम्हीच.



अण्णा म्हणजे काय?

ते नाव नाही, तो एक प्रेरणास्त्रोत आहे. कोरड्या मातीतून फुललेलं क्रांतीचं फूल आहे. राळेगणसिद्धी या गावी जलसंधारणाच्या माध्यमातून सुरुवात करून, गावसुधारणा, नशाबंदी, ग्रामसभा सशक्तीकरण, ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन, ग्रामस्वराज्याची व्याख्या—या साऱ्यांना प्रत्यक्षात उतरवणारा 'कार्यकर्ता' म्हणजे अण्णा.भ्रष्टाचाराच्या विषवेलीने देश पोखरलेला असताना अण्णांनी शुद्ध राजकारणाची मशाल पेटवली. ‘जनलोकपाल’ आंदोलन हे त्याचे सर्वोच्च शिखर. दिल्लीच्या रमलीला मैदानावर त्यांनी उपोषण करत देशभरातील तरुणाईला व्याकुळ करून सोडले. लाखोंच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश तेव्हा फक्त अण्णांच्या कृतीमुळे होता.



सामाजिक व राजकीय शुद्धतेचे नायक

आज जेव्हा समाजात नैराश्य, विकृती, सत्तेचा उन्माद आणि लोभवृत्तीने चारही बाजूंनी कोंडमारा केला आहे, तेव्हा अण्णांसारखी व्यक्तिमत्त्वं म्हणजे जीर्ण झालेल्या मूल्यांचं पुनर्जन्म घेणं आहे. त्यांनी "सत्ता नाही, स्वच्छता हवी" हा संदेश दिला आणि जनआंदोलनांना उभारी दिली. कुठल्याही पदाची हाव नाही, गाजावाजा नाही, स्वतःच्या अंगावर झिजवलेली आंदोलनं आणि तोंडावर सांगितलेली सत्यं... हीच अण्णांची खरी ओळख.

त्यांच्या मार्गाने चालणं – एक तपस्या

मी स्वतः ज्या काही प्रमाणात समाजकारण करतो, जनआंदोलनांची दिशा घेतो, त्या प्रत्येक पावलामागे अण्णांची शिकवण आहे. त्यांनी शिकवलं – उपोषण म्हणजे मागणीसाठी केलेलं आत्मबलिदान. आंदोलन म्हणजे वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक शुद्धीची प्रक्रिया. त्यांनी सांगितलं की रस्ता बदलवायचा असेल तर 'पायाला काटे सोसावे लागतील.' त्या काट्यांची जाणीव त्यांनी स्वतःच्या आयुष्याने आम्हाला दिली.

अण्णा, तुमचं संपूर्ण आयुष्य हे एक झळाळतं आरसपानी आहे – जे पाहताच प्रत्येकाला स्वतःच्या अंतरंगाचा विचार करावा लागतो. आणि म्हणूनच तुमच्यासारख्या नायकाच्या वाढदिवसाला केवळ 'शुभेच्छा' देणं हा केवळ एक औपचारिक भाग नाही, ती एक जबाबदारी आहे. ही शुभेच्छा म्हणजे तुमचं काम पुढे नेत राहण्याची प्रतिज्ञा आहे.

तुमच्या कर्तृत्वाचं कवच – आजच्या पिढीला मार्ग

आजच्या तरुणाईला दिशा लागलेली नाही, अनेकांना दिशाभूल होते आहे. अण्णांप्रमाणे जीवन जगणं – म्हणजे त्यांना एक ज्योत देणं आहे. "स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगा" हे त्यांनी केवळ सांगितलं नाही, तर प्रत्यक्ष जगून दाखवलं.या वयातसुद्धा त्यांची शिस्त, संयम, साधेपणा आणि समाजाप्रती असलेली आस्था बघून लाज वाटते – की आपण अजूनही केवळ बोलण्यात मग्न आहोत! अण्णांच्या जीवनशैलीकडे बघताना जाणवतं – की खऱ्या समाजसुधारकाची ओळख ही त्याच्या कृतीतूनच होते, गोंगाटातून नव्हे.




मन:पूर्वक शुभेच्छा

आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण कृतज्ञतेने नतमस्तक आहोत. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, आयुष्य अजून उदात्त प्रेरणा देत राहो, आणि आम्हाला या देशाच्या वाटचालीत योग्य दिशा दाखवत राहो, हीच प्रार्थना!

तुमचं आयुष्य म्हणजे एक अनवट वाटेचा दीपस्तंभ आहे – त्याची चमक आम्हाला अंधारात चालण्याचं बळ देत राहो

                                     ∆ गजानन हरणे

                                      •  समाजसेवक                      विश्वस्त व जिल्हाध्यक्ष – अण्णा हजारे प्रणित

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, महाराष्ट्र राज्य.

                                     •  जिल्हा अध्यक्ष,

                                   राष्ट्रीय लोक आंदोलन .

संयोजक – निर्भय बनो जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...