• ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर यांचे विचार
• नियम व कायद्याचे काटेकोरपणे पालन केल्यास समाजाला मोकळा श्वास घेता येईल
अकोला :
आपण आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे नियम, कायदा यांचे काटेकोरपणे पालन केल्यास समाजाला मोकळा श्वास घेता येईल संपूर्ण समाज आपला आहे ही भावना रुजविण्यासाठी प्रत्येकाने हृदयपूर्वक प्रयत्न करावेत असे विचार ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक समितीचे सदस्य महेंद्र कवीश्वर यांनी व्यक्त केले।
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून डॉ आनंदीबाई जोशी महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नागरी कर्तव्य व शिष्टा चार या विषयावर कवीश्वर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते, अध्यक्षस्थानी संस्था व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष जयंत पडगीलवार हे होते या समितीचे सदस्य वैशाली देशपांडे, अभिजीत शोभणे, अविनाश तोडसाम, विलास अनासाने, प्राचार्य शरदचंद्र ठोकरे हे व्यासपीठावर विराजम होते।
कोण काय करतो यापेक्षाही मी काय करतो यावर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे आहे असे सांगून आपले शहर, गल्ली, रस्ते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि नियमांचे काटेकोर पालन सर्वांनी करावे राष्ट्रीय मांनकांचा अवमान होऊ नये याचीही काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन ही महेंद्र कवीश्वर यांनी केले।
डॉ प. दे कृ वि चे प्रा डॉ हर्षवर्धन देशमुख यांनी पर्यावरण रक्षण व संवर्धन या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही पर्यावरणाचा ऱ्हास यामुळेच होतोय याचा विचार प्रत्येकानेच करण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील याकडे डॉ देशमुख यांनी लक्ष वेधले।प्रारंभी प्राचार्य ठोकरे यांनी वृक्ष रोप देऊन मान्यवरांचे स्वागत केले संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्यात असे प्रस्ताविकातून सांगत सर्वांचे स्वागत केले। संचालन प्रशांत बोकाडे ,आभार सोनल कुळकर्णी यांनी मानले।संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पद्धतीने केले कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात या खात्याच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनीही आभासी पद्धतीने मोलाचे मार्गदर्शन केले।कौशल्य गीताने आरंभ झालेल्या या सुरेख सोहळ्याची सांगता राज्यगीताने झाली। गटनिदेशक रणजित महल्ले यांच्यासह संस्थेतिल कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक हा कार्यक्रम यशस्वी केला।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा