प्रा.डॉ.मोहन खडसे यांचं गुपित आनंदाचं !
समीक्षक
तुळशीराम बोबडे
संवाद : 94097147809
प्रत्येक व्यक्ती सुख आनंद शोधत असतो. पण खरं सुख माणण्यात असते. ते एक गुपित असते आपणा सर्वांना एक सुंदर कथा माहित असेलच की, एक व्यक्ती सुखी होण्यासाठी सुखी माणसाचा सदरा शोधत असते. तो खूप मोठं मोठ्या व्यक्तीकडे जातो. लखपती, अरबोपती, उदयोगपती पण कुणीच सुखी नसतो. कुणालाच शांत समाधानाची झोप लागत नसते. कुणाला कश्याची तर कुणाला कश्याची चिंता असते. शोधत शोधत तो थकून एके दिवशी एका शेतात गाढ झोपलेल्या माणसांजवळ जातो . व तो झोपेतून जागा झाल्यावर त्याला म्हणतो तुम्ही सुखी समाधानी दिसत आहात. कारण इथे बेड, उशी नसताना तुम्ही शांत, चिंतारहित झोपला होता. ती व्यक्ती उत्तर देते, हो मी सुखी समाधानी आहे. मला जे मिळाल त्यात मला समाधान आहे. शोधणारी व्यक्ती म्हणते तुमचा सदरा मला कृपा करुन द्या. तर उत्तर येते भल्या माणसा माझ्या अंगात तुला सदरा दिसून राहला का? माझ्याकडे सदराच नाही असं दिसून आलं की ज्यांचेकडे सर्व काही आहे, सदरा आहे ते सुखी समाधानी नाहीत व जे समाधानी आहेत त्यांच्याकडे सदराच नाही. तात्पर्य, सुख आनंद माणण्यात आहे.
माणूस सकारात्मक विचार करणारा असावा आणि हाच मुद्दा घेऊन प्रा. डॉ. मोहन खडसे यांनी गुपित आनंदाचं, हे वैचारिक लेखाच पुस्तकं लिहलं आहे. यांचं हे सहावं पुस्तकं आहे. यातील सर्व लेख सकारात्मकता बिंबवण्याचा प्रयत्न करतात हेच आहे गुपित आनंदाचं.
आनंद जबाबदारीचा असतो, प्रयत्नाचा असतो, कचऱ्यातून सुगंध निर्माण करण्यात असतो. संयम, पारख, कृतज्ञता संघर्ष, विनम्रता, निसर्ग आनंद, व्यस्त राहणं, सकारात्मक असणं, छन्द जोपसणं, प्रार्थना करणं, संतुलन संयम, समन्वयं साधनं हे सर्व आहे गुपित आनंदाचं .
एका लेखात एक सुंदर शेर आला आहे
चाहे कितनी सजालो तस्वीरे आईनेके लीये एक जगह रखना दोन ओळीत खूप मोठा आशय आला आहे. आपले विविध मुद्रेतले, विविध कोनातले, विविध पोशाखतले फोटो खूप सुंदर असू शकतात. पण आपला खरा चेहरा आपल्याला आरसाच दाखवू शकतो. खरं म्हणजे स्वतःला स्वतःच्या अंतरात्मात शोधावं ती खरी आपली तस्वीर. गरज ही शोधाची जननी आहे गुगल कपंनीचे वरिष्ठ अधिकारी सुंदर पिचई यांनी अश्याच एका प्रसगातून संदेश घेत जगाला उपयोगी मॅप चा शोध लावला. यशाचे नाते शिफारस यापेक्षा श्रम, गुणवत्ता, योग्यता, यात असते असं लेखक एका लेखात नमूद करतात व ते तंतोतंत खरं आहे
आँखे भी खोलनी पडती है उजालेके लिये केवल सूरज निकलनेसे अंधेरा नहीं चला जाता.
मनासारखं नेहमीच घडून येत नसते हा सकारात्मक संदेश लेखक देऊन जातात. आपल्या प्रमाणे इतरांचाही विचार आपण करावा. त्यांच्या भूमिकेत आपण शिरून पहावे. असा महत्वपूर्ण संदेश लेखक देऊन जातात. त्यामुळे वाचक सकारात्मक बनतो असे कितीतरी आयुष्यात सुखी आनंदी होण्याचे मंत्र लेखकांने ५१लेखात दिले आहेत. प्रा. डॉ. मोहन खडसे हे केवळ लिहून थांबले नाहीत, तर हे लेख त्यांनी जीवनात उतरवले आहेत. एक माणूस म्हणून त्यांचा खूप मोठा लौकिक आहे. पत्रकारितेतले असूनही विनम्रता आहे. प्रसंगी कठोरताही ते धारण करतात. लेखकांनहे गुपित आपल्यासाठी खुलं केलं आहे त्याबद्दल त्यांना नमन व भावी लेखणासाठी शुभेच्छा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा