मुख्य सामग्रीवर वगळा

लोकनेते स्व.पुरुषोतम 
उपाख्य भाऊसाहेब येते

                    लेखक : 
             •  प्रा. शरद पुसदकर, 
    अमरावती. संवाद : 9423608651

                    
       कोणी आपल्या व्यक्तीमत्वाने कोणी आपल्या पेह‌रावाने, कोणी आपल्या वक्तृत्वाने लोकांचे लक्ष वेधून घेते. मात्र भाऊसाहेब येते आपल्या साध्या राहणीमानाने व नम्रतेने लोकांना जिंकून घेत.  त्यांच्या साध्या राहणी सारखे त्यांचे विचारही निर्मळ होते. ते काँग्रेस पक्षाशी आजीवन एकनिष्ठ राहीले. ते अत्यंत निस्वार्थी असे दुर्मीळ राजकारणी होते. त्यांनी काँग्रेस सेवाद‌लाचे अमरावती जिल्हा महाधिनायक म्हणून केलेल्या कार्याचा माजी राष्ट्रपती शंकरद‌याल शर्मा हयांनी गौरव केला होता.
         ते आयुष्यभर निर्मोही व व्यवहारातील भ्रष्टाचारापासून पूर्णतः अलीप्त राहीले. ते राजकारणात राहूनही त्यागी वृत्तीचे होते. असे म्हणतात की कांग्रेस पक्षाची आमदारकीची तिकीट त्यांना मिळत असूनही दिलेल्या शब्दाखातीर आपल्या मित्रास दिली व अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी प्रचारकार्यही केले.
त्यांना लोकसेवेच्या व्रताने झपाटले होते. सकाळी ८ पासून रात्री ११ पर्यंत ते जनतेच्या सेवेसाठी वाहून घेत. 
      बडनेरातील गोरगरीब हिंदू-मुस्लीम बांधवांकडे जाऊन त्यांचे दू:ख हलके करीत व समस्या सोडविण्यासाठी सर्व प्रयास करीत. कामगार वर्गासोबत येते साहेबांचे आपुलकीचे नाते जुळले होते. बडनेरा येथील विजय मील बंद झाल्यानंतर कामगारांचे हाल त्यांनी पाहिले. बंद मील सुरू करण्यासाठी विविध आंदोलने केलीत. तसेच साखळी उपोषणे केलीत.  अखेरचा उपाय म्हणून मुंबईस आमरण उपोषण सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मील सुरू केली. त्यामुळे शेकडोंना आपला रोजगार परत मिळाला.
      बडनेरा नगर परिषदे‌चे ते 2 वेळा अध्यक्ष राहीलेत. त्या कार्यकाळात त्यांनी बडनेरा शहराचा विकास केला. दुसऱ्या टर्म मधेच बडनेरा नगर परिषदेच्या अमरावती महानगरपालीकेमधे विलीनीकरण झाले, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असतांना विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात. सहकार क्षेत्रामधे त्यांनी सुतार- लोहार सह सेवा सोसायटी, ग्राहक भांडार, संतोषीमाता सह. पॉवरलूम, सह‌योग शै. संस्था यांची स्थापना केली. कष्टकरी वर्गाच ते जातपातविरहीत सामान्य व सर्व धर्मातील कष्टकरी वर्गाचे मसीहा म्हणजे लोकनेते होते. स्वतः उच्चशिक्षीत इंजिनियर असूनही उच्चअधिकारी यांचेशी व अशिक्षीत गरीब व्यक्तींशीही तेवढ्याच सहजपणे मिसळत असत. 
        समाजकार्य करीत असतांना त्यांनी आपल्या घरादाराची पर्वा केली नाहीं.  बडनेरा येथील मील सुरु करून घेण्याचे आंदोलन उभे करण्यासाठी त्यांनी पत्नीच्या नावावरील शेतजमीन विकून पैसे उभे केले. नागरिकांचे गा-हाणे ऐकून ते सोडविष्याच्या व्यग्रतेन त्यांचे स्वतध्य कुटुं‌बाकडे काहीसे दुर्लक्षही झाले प्रसिध्दीपराङ्मुख व मितभाषी स्वभावामुळे त्यांनी स्वतःचा मोठेपणा कधी पक्षासमोर किंवा लोकांसमोर येऊ दिला नाही.

साधी राहणी, उच्च विचारसरणी

     भाऊसाहेबांवर महात्मा गांधीजींच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता. त्यांना पित्याकडून देशप्रेमाचा समृद्ध वारसा लाभला होता.   त्यांचे वडील स्व. विष्णुपंत येते हे स्वताही इंजिनियर व  आर्थिक संपन्न होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. एवढेच नव्हे तर कारावासही भोगला होता. ह्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रीय घरामधे मोठमोठया नेत्यांच्या नेहमी भेटी होत. 
        अगदी भाऊसाहेबांच्या काळातही अनेक मुख्यमंत्री मंत्री घरी येत. माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी यांच्याशी असलेल्या सलोख्यामु‌ळे त्यांनी इंदिराजींशी प्रत्यक्ष भेटून अनेकांची राजकीय कामे करून आणली होती
बडनेरा न. प. चे ते ५ वेळा नगर सेवक व अध्यक्षपदही भूषविले.  त्यांच्या कार्यकाळात बडनेरात त्यांनी अनेक विकासकामे केली.  अमरावती महानगरपालीकेत बडनेरा न. प.चे विलीनीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. 
      स्व इंदिराजींना अटक झाल्यानंतर उफाळलेल्या जनक्षोभ व आंदोलनात भाऊ‌साहेबांची सक्रीय भूमिका होती.   माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच अन्य राजकारणी मंडळींवर भाऊसाहेबांचा नैतिक प्रभाव होता.

       नाव,  धर्म, व जातपात भेद रहीत समाजकारणामुळे ते गोरगरीब नागरिकांचे लोकनेते झाले होते. म्हणूनच आजही त्यांचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्याची स्मृति म्हणून बडनेरा येथे होऊ घातलेल्या सांस्कृतिक भवनास  राणा यांच्या पाठ‌पुराव्यामुळे व पुरुषोत्तम उपाख्य भाऊसाहेब येते यांचे नांव देण्यात येत आहे.
     
                   लेखक : 
             •  प्रा. शरद पुसदकर, अमरावती.
    संवाद : 9423608651

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...