मुख्य सामग्रीवर वगळा



ग्राहक चळवळीचे प्रणेते
स्व.बिंदुमाधव जोशी (नाना)
      
           लेखक : मंजित देशमुख
                 संवाद :  99227 91837

  

        अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष,  थोर स्वातंत्र्यसेनानी, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी ( नाना ) यांचे आज दहावे पुण्यस्मरण...

        वेदांती योगाभ्यासी घराण्याची परंपरा असणाऱ्या आदरणीय बिंदुमाधव जोशी म्हणजेच नानांचा जन्म 25 सप्टेंबर 1931 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी झाला.  प्राचीन ग्रंथ, वेद, उपनिषदे यांचा उत्तम अभ्यास, शुद्ध जीवन, स्वच्छ व्यवहार, निरोगी आयुष्य , जाणकार योगाभ्यासी म्हणूनच समाजकार्यात झोकून देणं आणि ग्राहक चळवळीचा प्रचार आणि प्रसार कार्यासाठी संपूर्ण देशभर प्रवास करणं त्यांना शक्य झालं. यातूनच *ग्राहक चळवळीला भारतीय सिद्धांताचा  वैचारिक आयाम देऊन " वन लाईफ - वन मिशन "हे जीवनसूत्र मानून त्यांनी एक देशव्यापी संघटना बांधली.  आद.नाना हे अखेरच्या श्वासापर्यंत समाजशरण वृत्तीने अखंड कार्यरत राहून ग्राहक चळवळीचे तारणहार बनले.  


      विशुद्ध चारित्र्य, पारदर्शी व्यवहार, समाजाप्रती असणारी आत्मीयता माणसं जोडणं, त्यांच संघटन उभा करणं ही त्यांची कार्य गुणवैशिष्ट्ये. स्वतः नानांनी 1974 साली सुरू केलेल्या ग्राहक चळवळीचा नवा भारतीय विचार समाजा समोर मांडत ग्राहक शक्ती अधिक न्याय्य शक्ती म्हणजे शोषण मुक्ती हा सिद्धांत त्यांनी साध्य केला.  देशातील राष्ट्रपती,पंतप्रधानांपासून ते सर्वच क्षेत्रातील महानुभावांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा करून ग्राहक चळवळीचा हा नवा आयाम त्यांनी अंगी उतरविला.  त्यातूनच 1980  साली ग्राहकांच्या हितरक्षणासाठी म्हणून ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रारूप बनवण्यात आले सलग सहा वर्ष पाठपुरावा केल्यानंतर 24 डिसेंबर 1986 साली हा ग्राहक संरक्षण कायदा जन्मास आला. आणि शोषण मुक्तीचा एक नवा सिद्धांत कार्यान्वित झाला.  गाव तिथे ग्राहक पंचायत हे ध्येय घेऊन संपूर्ण भारताची त्यांनी परिक्रमा केली.  1995 मध्ये महाराष्ट्र शासनात स्वतंत्र ग्राहक कल्‍याण मंत्रालय स्थापन करण्यात आले या ग्राहक कल्‍याण उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदावरून ( केबिनेट दर्जाचे मंत्रिपद) प्रशासन ग्राहक चळवळीला कसे सहाय्य करू शकते याचे संपूर्ण देशासमोर एक आदर्श मॉडेल उभारण्यात आदरणीय नाना यशस्वी झाले.   त्याच माध्यमातून संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यांमधून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण कक्ष आणि स्वतंत्र न्यायदानासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगांची उभारणी करण्यात आली.भारताला विश्ववंदिता करवून सुजलाम सुफलाम मलयजत शीतलाम बनवूया हाच वचननामा तंतोतंत पालन केलेल्या 85 वर्षांच्या या ग्राहक चळवळीच्या पालनकर्त्याची 10 मे 2015  रोजी प्राणज्योत मालवली.  आज नाना जरी नसले तरी नानांचे विचार चिरंतन आहेत. तुमच्या माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते नानांचे विचार उरी शिरी घेऊन हि ग्राहक चळवळ पुढे नेत आहेत.  

बीज रुपी तूंची !

करी पेरणी स्वतःची।

उपजेल कणीस ऐश्वर्याचे !!

   हा विचार आणि वसा "अखिल भारतीय ग्राहक पंचायत" नेटाने आचरणात आणत आहे. 85 वर्षांच्या आयुष्यामध्ये हिमालयाची उंची आणि गंगेच्या ओघा इतकी पवित्रता लाभलेल्या आद. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्यातील बिंदू.. बिंदूंना आज दि.10 मे 2025 रोजी त्यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनी संपूर्ण भारतातील ग्राहक चळवळीच्या व्रतधारी कार्यकर्त्यांकडून विनम्र अभिवादन....

(लेखक हे अ.भा. ग्रा.पं. अकोला जिल्हाध्यक्ष आहेत.)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...