मुख्य सामग्रीवर वगळा



             आज मातृदिन विशेष

      लेखिका : डॉ.सौ.योगीता एस.चव्हाण 

    (होमिओपॅथीक तज्ञ. संवाद :  8999060620)


            कुठलाही एक दिवस आईचा नसतो, कारणं प्रत्येक दिवसच आईचा आणि आईमुळं असतो. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस खऱ्या अर्थाने घराला घरपण येत ते म्हणजे फक्त आईमुळेच त्यामुळे आईला जपायला हवं आणि त्याकरिता आईची आई व्हायला हवं.  तस बघायला गेलं तर प्रत्येक दिवस हा आईचाच आहे परंतु भारतासह जगातील अनेक देशांमध्ये आईच्या बद्दलची आत्मीयता, कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 



मातृत्व ही एक अशी निसर्गाच देण आहे जी अनेक भावनांचा संगम आहे, जिथे हिशोब हा केवळ प्रेमाचा होतो, अगदी गर्भधारणेपासन, प्रसूतीपर्यंत, त्यानंतर बाल संगोपन, तारुण्यवस्थेपर्यंत थोडक्यात काय तर पुरुष एकदा जन्माला येतो परंतु माता ही अनेकदा जन्माला येते, ती आयुष्यात अनेकदा नवनवीन अडचणींना सामोरे जाते आणि त्यावर मात कारून आपल्या बाळाच्या आयुष्यामध्ये आनंद कसा फुलवता येईल याकरता ती आपलं आयुष्य पणाला लावते.   खऱ्या अर्थाने आत्मा आणि ईश्वर या दोन शब्दांची सांगड म्हणजे आई आणि आई होणं जगातला तो खरा आणि निखळ आनंद आहे ज्यात फक्त त्याग आणि अनेक वेदना आहेत परंतु कुठलीही उपकाराची किंवा परोपकाराची भावना देखील मनाला स्पर्श करत नाही. खरंच जर आपल्याला ईश्वराची सेवा करायची असेल तर आईची करा कारणं आईच्या चरणातच खरा स्वर्ग आहे.   म्हणतात ना “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ”  मातृत्व कस आसवं याचं उत्तम उदाहरण म्हणजे माँ जिजाऊ आणि त्या मातृत्वाच्या त्यागातून उमललेलं एक सुंदर फुल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी आपल्या मातृत्वाचे खऱ्या अर्थाने पांग फेडले. आज भारत पाकिस्तान सीमारेषेवर सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत बलिदान होणारा सैनिक नाईक असो वा वनंजे यांनी आपल्या मातेच्या दुधाचे निश्चितच ऋण फेडलेत.








आज घडीला प्रत्येक मातेने आपल्या मुलांना कस घडवायला हवं म्हणजे आजचा आतंकवाद असो की समाजात वाढलेला व्याभिचार असो याला थाराच मिळायला नको कारणं आतंकवादी आणि त्याला कंठस्नान घालणारा सैनिक दोघेही कुठल्या ना कुठल्या मातृत्वाला संपवतायत, चला तर मग आपल्या मातेच्या मातृत्वाला योग्य न्याय देऊन एक  सुजलाम सुफलाम निर्मिती करिताचा प्रण करूया या मातृत्व दिनी !

(लेखिका ह्या होमिओपॕथिक तज्ञ आहेत)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...