"मन शांत नसेल, तर...
औषधंही काम करत नाही...
औषध घेतल्यावरही फरक जाणवत नाहीये? रक्त तपासणं, स्कॅनिंग, टेस्ट… सगळं नॉर्मल येतंय, पण तरीही त्रास कमी होत नाहीये? कदाचित त्रास शरीरात नसून, मनात असतो. “मन जेव्हा अशांत असतं…” ताण, चिंता, भीती, राग, अपराधीपणा या सगळ्या मनाच्या विषारी भावना तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम करतात. या मानसिक असंतुलनामुळे पचन, झोप, हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्ती अशा अनेक शारीरिक गोष्टी बिघडतात.
आणि मग औषधं दिली तरी तयार नसलेल्या जमिनीवर पाणी घातल्यासारखं काम होतं.
औषध हे ‘support’ आहे – ‘मुख्य उपचार’ नाही! कोणताही डॉक्टर – हृदयाचा असो, त्वचेचा असो, पचनाचा असो, किंवा होमिओपॅथिक – जर पेशंटचा mental state अस्थिर असेल, तर औषधं हळूहळू किंवा कमी काम करतात.
मग उपाय काय?
मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सकाळी 10 मिनिटं ध्यान, प्रार्थना, किंवा नुसतं शांत बसणं.
नेहमी स्वतःशी प्रेमाने बोला
“मी ठीक आहे. मी बरा होतोय. मी माझ्या शरीराचा आदर करतो.” रोज थोडा वेळ निसर्गात घालवा. फुलं बघा, मातीला हात लावा, गच्चीत बसा.
सकारात्मक लोकांशी बोला
नकारात्मक लोकांचं तात्पुरतं social detox करा! तुमचा ताण बोलून व्यक्त करा. डायरी लिहा, मित्राशी बोला, गरज लागली तर थेरपिस्टकडे जा.
मनाचं आरोग्य
शरीराच्या उपचारांचा पाया मनावर उपचार झाल्यावर औषधं जास्त प्रभावी होतात, आहार पचतो, झोप येते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि शरीर बरे होण्याचा वेग दुप्पट होतो. ही पोस्ट उपयोगी वाटली, तर आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करा. कदाचित कोणाचं तरी मन शांत झालं, तर शरीर आपोआप बरे होईल.
(विशेष सूचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा