बंडू खंडागळे गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था अध्यक्षपदी बिनविरोध
मुंबई :
गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेच्या आज रविवार- दिनांक 11 मे 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील पेन सावरसई येथील गोवा व्हीला अँड रिसॉर्ट- पि.के बँकेट हॉल शेने- सावरसई येथे झालेल्या संस्थेच्या कार्यकारणी सर्वसाधारण सभेत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष-बंडू विरेश्वर खंडागळे यांची एक मताने एक मुखाने पुन्हा एकदा 2025 ते 2029 पाच वर्ष कालावधी करिता सर्व सदस्य यांची सभागृहामध्ये हात वरती करून एकतर्फी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
प्रोसिडिंग आणि जमा खर्च मंजूर केले. या सर्वसाधारण बैठकीच्या निमित्ताने कामकाज सुरू असताना आज पर्यंत नियोजित समाज मंदिर जागा खरेदीसाठी ज्या सदस्य यांनी अद्याप पर्यंत संस्थेकडे आपली देणगी ठरावाप्रमाणे जमा केली नाही. याची माहिती संस्थेच्या वतीने अध्यक्ष यांनी सभागृहात मांडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष- बंडू खंडागळे, त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी- विशाल गुरव, विजय ठोसर, अमोल गुरव, बबन गुरव, रमेश गुरव, सुरेश गुरव, रुपेश गुरव, योगेश गुरव, रमेश [बुवा] गुरव, अण्णा बिराजदार गुरव, विनायक ढवळे, सौ अमृता काळे, यांनी आपापल्या माध्यमातून समाजाविषयी आपापली व्यक्तिगत मते मांडून उपस्थित समाज बांधव कार्यकारी मंडळाला मार्गदर्शन केले. या सर्वसाधारण बैठकीसाठी पेन येथील अनेक समाज बांधव स्थानिक यावेळी उपस्थित होते. या सर्वसाधारण बैठकीत समाजातील समाज बांधवांचे काही कौटुंबिक, वैवाहिक, आर्थिक, व्यावसायिक प्रश्न, संस्थेचे अध्यक्ष- बंडू खंडागळे यांनी संस्थेच्या बैठकीच्या कामकाजामध्ये अधिकृत संस्थेच्या पटलावर घेऊन त्याबाबतीमध्ये कार्यकारी मंडळासमोर दोन्ही समाज बांधवांना सामोरे घेऊन व्यक्तिगत मध्यस्थीची भूमिका भूमिका मांडून मार्गदर्शन केले. यावेळी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या संभाजीनगर येथील सर्वसाधारण बैठकीतील संपूर्ण महाराष्ट्रातील गुरव समाज बांधवांसाठी नव्याने सॉफ्टवेअर- ॲप्स तयार झाला असल्याने त्या बाबतीत गुरव बांधवांचे संघटन करण्यासाठी आणि राज्यातील गुरव समाजाची संख्या किती आहे. हे समजण्यासाठी त्याचा फायदा समाज बांधवांना कसा होईल. त्याच बरोबर श्री संत काशिबा महाराज आर्थिक विकास युवा महामंडळ आणि राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला देवस्थान अधिनियम विश्वस्त कायदा 1950 या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून विधेयक दुरुस्ती करण्याबाबत संस्थेचे अध्यक्ष यांनी यावेळी उपस्थित सभागृहामध्ये सर्वांना मार्गदर्शन केले. या बैठकीच्या निमित्ताने गोवा व्हीला रिसॉर्टचे प्रोप्रा-हरेश विरेश्वर खंडागळे आणि कुटुंबीयांकडून सर्व कार्यकारी मंडळासाठी विशेष भोजन व्यवस्था केली होती. या बैठकीसाठी संस्थेचे मार्गदर्शक माननीय दत्ताजीराव मसुरकर यांच्याकडे कुटुंबामध्ये दुःखद घटना घडली. असल्याने ते सर्वसाधारण बैठकीसाठी उपस्थित नव्हते. यावेळी गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष-बंडू खंडागळे, विजय साळुंके, सुरेश गुरव, रमेश (काका) राजगुरव, रमेश गुरव, सौ रुणाली गुरव, श्रीमती मंदा गुरव, संजय मोरे, रुपेश गुरव, रमेश (बुवा) गुरव, संदीप खंडागळे, रवींद्र गुरव, सचिन गुरव, प्रभाकर भालेराव, सुरेश दळवी, राजेंद्र निळकंठ, रामचंद्र गुरव, विनायक ढवळे, योगेश गुरव, प्रदीप बागुल, संजय गुरव, रमेश खंडागळे, विशाल गुरव, समीर गुरव, देविदास गुरव, नंदकुमार गुरव, हरेश खंडागळे, अमोल गुरव, विजय ठोसर, सौ अमृता ढवळे, भगवान गणेशकर, त्याचबरोबर स्थानिक समाज बांधव- यशवंत गुरव, अरुण गुरव, राजेंद्र गुरव, सौ लता गुरव, श्रीमती वासंती देवकर, अण्णा बिराजदार, वसंत गुरव, अभिजीत गुरव, प्रवीण गुरव, प्रशांत ढवळे, अजित अहिर, अमोल ढवळे, मनोहर अहिर, याप्रमाणे अनेक समाज बांधव उपस्थित होते. राष्ट्रगीता नंतर सर्वसाधारण बैठकीची सांगता झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा