• रामनवमीची आख्यायिका
• रामनवमीची संपूर्ण माहिती, कथा, पूजा
• पंडित व्यंकटेश देशपांडे
पुराण आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार घेतला. भगवान राम हे विष्णूचा सातवा अवतार म्हटले जातात. जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरला होता. या दिवशी सर्वजण भगवान रामाच्या जन्मानिमित्त आनंद साजरा करतात. रामनवमीच्या सणाच्या दिवशी चैत्र नवरात्र संपन्न होते. शास्त्रानुसार, भगवान रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली होती. याच दिवशी अयोध्येमध्ये चैत्र राम जत्रेचंही भव्य आयोजन केलं जातं. सर्वजन एकमेंकांना या निमित्ताने रामनवमीच्या शुभेच्छा ही देतात.
रामनवमीची आख्यायिका
हिंदू धर्म ग्रंथात प्रभू श्रीराम आणि त्यांच्या तीन भावंडांच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे. या कथेनुसार राजा दशरथाला तीन राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. जेव्हा तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्ती झाली नाही तेव्हा राजा दशरथाने पुत्रेष्टी यज्ञ केला. प्रसादामध्ये यज्ञातून प्रकट झालेली खीर तिन्ही राण्यांना खाऊ घातली. काही काळाने राजा दशरथाच्या राजवाड्यात आनंदवार्ता मिळाली की, तिन्ही राण्या गर्भवती आहेत. त्यानंतर शुक्ल नवमीला कौशल्येने राम, कैकेयी ने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. अशाप्रकारे राजा दशरथाला आता त्याचे उत्तराधिकारी मिळाले. तेव्हापासून या तिथीला रामनवमीच्या रूपाने साजरं केलं जातं.
रामनवमीची पूजा कशी करावी?
रामनवमीच्या दिवशी पहाटे उठावे. आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. पूजेचं सर्व सामान घेऊन पूजेच्या ठिकाणी बसावे. भगवान श्रीरामाच्या मूर्तीला शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावे. नंतर धूपदीप, आरती, फुलं, चंदन इत्यादी अर्पित करून पूजा करावी. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुमच्या पूजेच्या साहित्यात तुळशीचं पान आणि कमळ असलंच पाहिजे. त्यानंतर प्रभू श्रीरामाची नवमी पूजा षोडशोपचारे पूर्ण करावी. खीर आणि फळांचा प्रसाद म्हणून दाखवावा. या दिवशी अनेकांकडे राम जन्म सोहळा साजरा केला जातो. काहींकडे चैत्र नवरात्रीनिमित्त कन्यापूजनही असते. कोकणात या निमित्ताने भरपूर ठिकाणी रामाचा पालखी सोहळा आणि जत्रा असतात.
रामनवमीसाठी विशेष नैवेद्य
रामनवमीच्या दिवशी अनेकजण चैत्र नवरात्रीचा उपवास सोडून रामजन्म साजरा करतात किंवा काहीजण फक्त रामनवमीला उपवास करतात. मग उपवास कांदा-लसूण विरहीत सात्विक जेवण जेवून सोडतात. बरेच जणांकडे रामनवमीच्या निमित्ताने पूरी-भाजी, शिरा आणि काळे चणे असतात. रामनवमीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी विधीवत भगवान रामाची पूजा केली जाते. या दिवशी हजारो लोकं अयोध्येला जाऊन पुण्य सलिला शरयू नदीमध्ये स्नान करून पुण्यार्जन करतात. स्नान करून ते भक्तगण भगवान रामाला आठवून भजन-पूजन करतात. घरोघरी आणि मंदिरांमध्ये राम चरित्राचा पाठ केला जातो.
रामनवमीची पूजा कशी करावी?
रामनवमीच्या दिवशी पहाटे उठावे. आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. पूजेचं सर्व सामान घेऊन पूजेच्या ठिकाणी बसावे. भगवान श्रीरामाच्या मूर्तीला शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावे. नंतर धूपदीप, आरती, फुलं, चंदन इत्यादी अर्पित करून पूजा करावी. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुमच्या पूजेच्या साहित्यात तुळशीचं पान आणि कमळ असलंच पाहिजे. त्यानंतर प्रभू श्रीरामाची नवमी पूजा षोडशोपचारे पूर्ण करावी. खीर आणि फळांचा प्रसाद म्हणून दाखवावा. या दिवशी अनेकांकडे राम जन्म सोहळा साजरा केला जातो. काहींकडे चैत्र नवरात्रीनिमित्त कन्यापूजनही असते. कोकणात या निमित्ताने भरपूर ठिकाणी रामाचा पालखी सोहळा आणि जत्रा असतात.
रामनवमीसाठी विशेष नैवेद्य
रामनवमीसाठी नैवेद्य
रामनवमीच्या दिवशी अनेकजण चैत्र नवरात्रीचा उपवास सोडून रामजन्म साजरा करतात किंवा काहीजण फक्त रामनवमीला उपवास करतात. मग उपवास कांदा-लसूण विरहीत सात्विक जेवण जेवून सोडतात. बरेच जणांकडे रामनवमीच्या निमित्ताने पूरी-भाजी, शिरा आणि काळे चणे असतात.
श्रीरामाच्या पुजेत पांढऱ्या मिठाई आणि पांढऱ्या फळाचं महत्त्व आहे. या दिवशी प्रसादाच्या रूपात पंचामृत, श्रीखंड, खीर आणि हलवा यांचा प्रसाद दाखवला जातो. श्रीरामाच्या पूजेत दूध आणि तूपाच विशेष महत्त्व आहे. यामुळेच रामनवमीच्या दिवशी तूपापासून बनवलेल्या मिठाया खाल्ल्या जातात. खरंतर उपवास आणि प्रसाद हे दोन्ही उत्सवांचा आवश्यक भाग आहेत. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाला खीर, केशर भात किंवा धण्याचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही मिठाईचा नैवेद्य दाखवणार असाल तर बर्फी, गुलाबजामून किंवा कलाकंदचा नैवेद्य दाखवणे उत्तम असतं.
श्रीरामाच्या पूजेसाठी खास मंत्र
श्रीराम हे हिंदूंमधील सर्वात लोकप्रिय देवता आहे. रामाची पूजा ही प्रत्येक घरात होते आणि रामाला आदर्श मानवाचं उदाहरण मानलं जातं. अशी मान्यता आहे की, रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णुंचा सातवा अवतार असलेल्या भगवान श्रीरामाच्या कथांचा पाठ करणं खूप पुण्यदायी असते. या दिवशी जागरण करून रामायणाचं पठण केल्याने आत्मिक शुद्धी होते आणि पापक्षालन होतं. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही रामनामाचा जपही करू शकता. कलियुगात लोकांकडे वेळ कमी असल्याचं लक्षात घेऊ महर्षी वाल्मिकी यांचं एक श्लोकी रामायणाचंही पठण केलं जातं. ज्यामध्ये संपूर्ण रामायणाचं सार आहे.
अदौ राम तपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनम्। वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणम्। वालि निग्रहणं समुद्र तरणं लंका पुरी दास्हम्। पाश्चाद् रावण कुंभकर्ण हननं तद्धि रामायणम्।
संत तुलसीदास यांनीही बालकांडच्या तिसऱ्या दोह्यांमध्ये एक श्लोकी रामायणाची रचना केली आहे. तुम्ही त्याचंही पठण करू शकता.
‘नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम् पाणौ महासायकचारुचापं युद्ध नमामि रामं रघुवंशनाथम्’
पवित्र मनाने हातपाय धुवून भगवान रामाची मूर्ती किंवा फोटोच्या समोर ध्यान लावून दिवसभरात कोणत्याही वेळी 9 वेळा एक श्लोकी रामायणाचं पठण केल्याने संपूर्ण रामायणाच्या पठणाचं फळ मिळतं. भक्तगण रामाच्या मंत्राचाही रामनवमीच्या निमित्ताने जप करतात. ज्यामुळे त्यांच्यावर प्रभू श्रीरामांची कृपा होते. या मंत्रांमध्ये खालील मंत्रांचा समावेश होतो.
• ॐ श्री रामाय नमः॥
• श्रीराम जय राम जय जय राम ।।
• दाशरथये विद्महे सीतावल्लभाय धीमहि, तन्नो राम प्रचोदयात्॥
• ॐ आपदामपहर्तारम् दाताराम् सर्वसम्पदाम्।
• लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो-भूयो नमाम्यहम्॥
• श्री राम जय राम कोदण्ड राम॥
अशा प्रकारे आपण राम नवमी साजरी करू शकते.
तसेच राम रक्षा स्तोत्राचे पाठ करावे.
• पंडित व्यंकटेश देशपांडे
संपर्क :- 7499121664/ 9881601459.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा