अकोला : "समाजात संवेदनेचा ओलावा कायम
ठेवण्यासाठी सूर्यबाला सारख्या संवेदनशील लेखिकेचं साहित्य काळाची गरज आहे. त्यांच्या साहित्यातील संवेदनेचं गहन अध्ययन आणि समर्पक विश्लेषण या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. डॉ. पूनम पिसे लिखित हे पुस्तक संग्रहनीय आहे आणि त्याचं स्वागत व्हायला हवं." असं वक्तव्य विद्योत्तमा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुबोध कुमार मिश्र यांनी केल. ते विद्योत्तमा फाउंडेशनच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी समीक्षक म्हणून बोलत होते.विद्योत्तमा फाउंडेशन, नाशिक च्या पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताचं यशस्वी पने संपन्न झाला त्या प्रसंगी 'सूर्यबाला: संवेदनाओं का ज्योति पुंज' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. पुस्तकाची प्रस्तावना वरिष्ठ लेखक डॉ. दामोदर खड़से यांनी लिहिली आहे व वनिका प्रकाशन तर्फे पुस्तक प्रकाशित आहे. या समारोहा प्रसंगी मोठ्या संखेने साहित्यकार आणि रसिक श्रोते व विद्योत्तमा फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचा शुभारंभ दिपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजनाने झाला . श्रद्धा शिंदे यांनी आरंभी सुमधुर आवाजात सरस्वती वंदना सादर केली. अतिथींचं स्वागत विद्योत्तमा च्या पदाधिकार्यां कडून करण्यात आलं. या प्रसंगी व्यासपीठावर विद्योत्तमा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री सुबोध कुमार मिश्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शीतला प्रसाद दुबे कार्याध्यक्ष - महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी, कार्यक्रम उद्घाटक श्री के. सी. पाण्डेय, सी. एम. डी. गारगोटी मिनरल संग्रहालय, नाशिक, मुख्य अतिथिडॉ. प्रो. राम कुलकर्णी झोनल सेक्रेटरी गोखले ए. सोसा., नाशिक. विशिष्ट अतिथि श्री अनिल कुमार प्रीतम क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त, नाशिक, पुस्तकाच्या लेखिका डॉ. पूनम मानकर पिसे, त्यांचे पति व किर्ति प्रिंटर्स के संचालक श्री. संजय पिसे व त्यांच्या मातोश्री श्रीमती सुनिता मानकर उपस्थित होत्या. कार्यक्रम च्या सुरूवातीला संस्था अध्यक्ष श्री सुबोध कुमार मिश्र यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना विशद केली. त्यानंतर पुस्तका विषयी विस्तृत मनोगत व्यक्त केलं .या प्रसंगी विषेश अतिथि डॉ. राम कुलकर्णी यांनी "'गोखले एज्युकेशन सोसाइटी या संस्थेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनीचं साहित्य क्षेत्रातलं पहिलं पाऊल एक गुरू आणि शिक्षक म्हणून आम्हाला सुखावणारं आहे" असं मनोगत व्यक्त केलं.याप्रसंगी द्वितिय सत्रांत सम्मान समारोह आणि तृतीय सत्रांत कवि सम्मेलन आयोजित केलं गेलं होतं.कार्यक्रमाचं सूत्र संचालन : ठा. भरत सिंह, डॉ सी. पी. मिश्र, श्रीमती अनीता दुबे, सुनिता माहेश्वरी, वर्षा सिंह यांनी तर आभार प्रदर्शन श्री स्वप्निल कुलकर्णी यांनी केलं.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा