मुख्य सामग्रीवर वगळा

गॅस वितरकांच्या कार्यालया समोर सकाळ पासून ग्राहक रांगेत उभे असल्याचे वास्तव आहे.

घरगुती सिलेंडर वितरणावर प्रशासनाचे कडक नियंत्रण आवश्यक
सनातन संस्कृती महासंघाची मागणी
अकोला :- मध्य पुर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगातील तेल आणि गॅस चा पुरवठा प्रभावित झाला आहे. गॅस वितरकांच्या कार्यालया  समोर सकाळ पासून ग्राहक रांगेत उभे असल्याचे वास्तव आहे. ग्राहकांनी नियमानुसार ऑनलाइन बुकिंग केल्यावर त्यांना कालक्रमानुसार घरपोच सेवा मिळणे आवश्यक आहे. 
       एका ट्रकमध्ये साधारणपणे ३०० वर सिलेंडर असतात. काही वितरकांनी ग्राहकांना घरपोच सेवा देणे बंद केले आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यावर ग्राहकांना वितरकांच्या कार्यालयात जाऊन रक्कमेचा भरणा करून पावती घ्यावी लागते.
       ट्रक जेंव्हा येईल त्यावेळेला पुन्हा रांगेत लागून सिलेंडर न्यावे लागते. ट्रक कधी येईल याची माहिती नसल्याने तसेच पावत्या जास्त फाडल्यामुळे ग्राहकांना सिलेंडर मिळेलच याची खात्रीदेखिल मिळत नाही. वितरक ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेऊन तीचा वापर करतात. हे योग्य नाही. काही वितरकांचे कार्यालय आणि गोदाम एका टोकाला असतात. ते ग्राहकांना सिलेंडर नेण्यासाठी शहराच्या दुसय्रा टोकाला बोलावतात. याचा ग्राहकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास होतो आहे.
        प्रशासनाने जाहीर केलेल्या एल पी जी हेल्पलाईन क्रमांकावर शासकीय सुट्टी च्या दिवशी फोन केला असता, मोबाईल बंद होता. प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक दररोज किती वाजता पासून किती वाजेपर्यंत सुरू राहील, तसेच सुट्टी च्या दिवशी सुरू राहील का? याचा जाहीर खुलासा करावा.
        युद्धामुळे गॅस च्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे ही, वस्तूस्थिती असली तरी रांगा बघून लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण होवू नये म्हणून, प्रशासनाने गॅस वितरकांनी ट्रक आल्यानंतर ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना कालक्रमानुसारच घरपोच सेवा द्यावी, असे सक्त निर्देश देण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी सनातन संस्कृती महासंघातर्फे ऋषिकेश जकाते यांनी केली असल्याचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर आणि मिलिंद गायकवाड यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...