मुख्य सामग्रीवर वगळा

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन


२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन

मायबोलीत बोलू या!
 चला… मराठीतच बोलू या!!
           
          लेखक : प्रवीण टाके
          उपसंचालक (माहिती)विभागीय                माहिती कार्यालय,कोल्हापूर
           संवाद : 9702858777

      राठी भाषा हजारो वर्षांच्या इतिहासाने समृद्ध आहे. ही भाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर आपल्या संस्कृतीचे, ऐतिहासिक परंपरेचे आणि सृजनशीलतेचे जिवंत प्रतीक आहे. ‘माय मराठी’ या संकल्पनेत तिचे शुद्ध, प्रमाण आणि अभिजात रूप जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विविध उपभाषांनी वाढवलेले तिचे वैविध्यही महत्त्वाचे आहे.
      मराठी ही उपभाषांनी समृद्ध झालेली भारतातील एक प्रमुख भाषा आहे.मातृभाषा आपले अस्तित्व असते.  बोलीभाषा माणसाची अस्मिता असते. प्रत्येक बोलीत तिचा वेगळा रंग, वेगळी लय आणि वेगळे चैतन्य तसेच लोकजीवनाचे प्रतिबिंब सामावलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना जगातील एका अभिमानास्पद भाषेला आपण ‘माय मराठी’ म्हणतो, याचा आत्मीय अभिमान बाळगण्याचा हा दिवस आहे.
      हा दिवस प्रत्येक मराठी माणसाने व्यवहारात, शिक्षणात, प्रशासनात, माध्यमांमध्ये आणि दैनंदिन संभाषणात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करण्याचा संकल्प करण्याचा आहे.

मराठी भाषा गौरवदिन : 27 फेब्रुवारी

वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, म्हणजेच 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी साहित्य आणि भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
        21 जानेवारी 2013 रोजी मराठी भाषा विभागाने अधिकृतपणे या दिनाची घोषणा केली. तसेच 3 ऑक्टोबर रोजी राज्यात ‘अभिजात मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. तर दरवर्षी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. राज्यभरात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम, वाचन उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दोन्ही दिवसांत राज्यभर विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
       मराठी भाषेचा गौरव करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी आणि विस्तारासाठी चिंतन करण्याची ही संधी असते. चला, यावर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना मराठीला समृद्ध करणाऱ्या उपभाषांचा वाटा समजून घेऊया.

   विविध उपभाषांचा समृद्ध वारसा

महाराष्ट्रात विविध बोलीभाषांचा विपुल वापर आढळतो. नाथ, महानुभाव आणि वारकरी संत परंपरेतील संतांनी प्राचीन काळापासून विविध बोलींचा वापर करून मराठी भाषेला अधिक व्यापक केले. आपण सर्वांनी आपल्या बालपणी चिमणी आणि कावळ्याची गोष्ट ऐकली आहे...तुम्हाला माहिती आहे, श्री. चक्रधर स्वामींनी ही गोष्ट आठशे वर्षांपूर्वी रुसलेल्या एका मुलीला सांगितल्याची नोंद लीळाचरित्रात आहे. कविश्रेष्ठ कालिदास, शूद्रक यांच्या शाकुंतल, मृच्छकटिक या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठी बोली भाषेत आहेत.
         वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, मालवणी, कोल्हापुरी, मराठवाडी, नागपुरी, झाडीबोली, खानदेशी, गोंडी, बंजारा, कोलामी अशा असंख्य उपभाषा मराठीच्या समृद्ध परंपरेचा भाग आहेत. प्रत्येक उपभाषेला स्वतंत्र ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.
       जशा अनेक उपनद्या मिळून नदी अधिक विशाल आणि समृद्ध होते, तशाच या उपभाषांनी मराठी भाषेला गोडवा, विस्तार आणि ऊर्जा दिली आहे.
       उदाहरणार्थ, वऱ्हाडी ही अत्यंत प्रभावी उपभाषा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीता’ मध्ये वऱ्हाडी भाषेचा प्रभावी वापर दिसतो. त्यांनी संपूर्ण गावगाडाच मराठीत मांडला आहे.तसेच संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनांमधूनही वऱ्हाडीचा सहज आणि प्रभावी उपयोग आढळतो.आचार्य प्र.के.अत्रे यांनी गाडगेबाबांच्या वऱ्हाडी संबोधनाचे जाहीर कौतुक केले आहे.
        कोकणी व मालवणी बोली त्यांच्या खास गोडव्यासाठी ओळखल्या जातात, तर कोल्हापुरी बोली तिच्या रांगड्या ठसक्यासाठी प्रसिद्ध आहे. झाडीबोली आणि गोंडी भाषेच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन झाला आहे. झाडीबोलीतील नाटकांची परंपरा महाराष्ट्राला ज्ञात आहे. खानदेशी आणि अहिराणी भाषेचा गोडवा बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून प्रत्ययास येतो.
         उपभाषांवर प्रादेशिक प्रभाव असतो. उदाहरणार्थ, कोकणी मराठीवर कन्नडचा प्रभाव जाणवतो. ‘अक्का’ हा मोठ्या बहिणीसाठी वापरला जाणारा गोड शब्द कन्नड-तेलुगू भाषांमधून मराठीत रूढ झाला आहे. वऱ्हाडीमध्ये, झाडीबोलीत हिंदीचे, तर अहिराणीमध्ये गुजरातीचे अनेक शब्द सहजपणे मिसळलेले दिसतात. खरे तर हीच भाषेची खरी ताकद आहे—स्वीकारण्याची आणि समृद्ध होण्याची!

मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास

       उपभाषांनी मराठीला अधिक व्यापक आणि अभिव्यक्तिपूर्ण बनवले आहे. राज्य शासनाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धक, अभ्यासक, संशोधक, लेखक आणि साहित्यिक यांचा सन्मान करण्याचे निर्देश दिले आहेत.
       भाषाविषयक स्पर्धा, परिसंवाद, व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्राचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे. मराठीचा प्रशासनिक, शैक्षणिक आणि सामाजिक वापर वाढवणे ही काळाची गरज आहे.
      शासन प्रयत्नशील आहेच; परंतु सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी विविध बोलीभाषांचा अभ्यास करून त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. भाषेचे संवर्धन हे केवळ धोरणातून नाही, तर व्यवहारातून होते.
 
       मराठीचा वापर वाढवू या!

 ‘उपभाषांनी समृद्ध झालेली माय मराठी’  हा विचार मराठीच्या सर्वांगसुंदरतेची जाणीव करून देतो. भाषा ही आईसारखी असते—विशाल, सामावून घेणारी आणि ममत्वाने ओथंबलेली.
महाराष्ट्रात येणारा कोणताही व्यक्ती या भाषेचा गोडवा अनुभवतो आणि सोबत घेऊन जातो. ‘तुम्हाला मराठी येते म्हणजे तुम्ही मराठी आहात’ हा या भाषेचा उदात्त बाणा आहे.
त्यामुळे आज मराठी भाषा गौरव दिनाला जागतिक स्तरावर मराठीचा सन्मान टिकवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी..
मराठी माध्यमातील शिक्षणाचा प्रसार
मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे
आधुनिक माध्यमांवर मराठीत अभिव्यक्त होणे
दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर
ही अत्यावश्यक पावले आहेत.
दिवंगत कवीवर्य डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी मराठीच्या सामर्थ्याचे सुंदर वर्णन केले आहे—
मराठीची प्रतिभा, ज्ञानेश्वरीत समावते
ग्रामगीता गाथाही, मराठीतच मावते
लावणीतून मराठीचे, सौंदर्य ओसंडते
शौर्य आणि औदार्य, पोवाड्यातून सांडते
मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले
गाडगेबाबा मराठीतच जन्म घेऊन गेले
अमृताशी पैज जिंकते, मराठी बोली
आभाळाची उंची जिच्यात, समुद्राची खोली
साऱ्यांनी मराठी हुंकारावर डोलावे
मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे..!
चला… मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया, मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलूया..!
   •प्रवीण टाके, उपसंचालक (माहिती)
         विभागीय माहिती कार्यालय,                           कोल्हापूर
    संवाद : 9702858777

              SUPPER NEWS-24

विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार,अकोला.
       महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती.. मिळविण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group: or contact 9371854706


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...