मुख्य सामग्रीवर वगळा

आजची कथा


आजची कथा

कर्माचा सिध्दान्त 

                     लेखक
                    - सचिन मधुकर परांजपे
                    पालघर

     “युष्यभर मजबूत पैसे खाऊन, अतोनात भ्रष्टाचार करुनही माणसं सुखासमाधानाने आणि मजेत रहातात त्यामुळे कर्मसिध्दान्त वगैरे सगळं झूट आहे” असा अनेकांच्या विचारांचा ट्रेन्ड सध्या दिसून येतो. मी अजिबात जजमेंटल नाही पण माझा अशा कितीतरी लोकांशी संपर्क आणि संवाद असल्याने मी याची एक्झॅक्टली दुसरी बाजू सांगतो. पटली तर घ्या नाहीतर सोडून द्या....
      माझ्या परिचयातील असेच एक गृहस्थ... आयुष्यभर फक्त अतोनात भ्रष्टाचार केला. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पैसे खाल्ले. रिटायरमेंटपर्यंत एकही इनक्वायरी नाही की कसली चौकशीही नाही. खाल्लेला पै न पै नीट पचवून, इन्वेस्ट्मेंट करुन आणि पुढच्या दोन पिढ्यांची व्यवस्था करुन पेन्शनीत मस्त आयुष्य जगत होते. कसलीही ददात नाही की काही नाही.... वरवर पाहता अतिशय सुखी आणि उत्तम आयुष्य. रोज स्कॉच आणि सिगारेटी वगैरे असूनही तब्येत धडधाकट. सहा परदेशप्रवास, आलिशान कार, मुलाचा बिझनेस... मज्जानू लाईफ.
      एकदा अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे आले, पत्रिका दाखवायला... बसले आणि इकडचं तिकडचं बोलून थेट रडायलाच लागले. मला समजेचना... मग विषयाला हात घातला. ते त्यानंतर जे काही म्हणाले ते मला तरी खूप आंतर्मुख करुन गेलं...
     “सचिन, वरवर बघता मी म्हणेन माझ्याइतका सुखी माणूस कोणी नाही. वारेमाप पैसा, तीन फ्लॅट्स, गावाकडे बंगला, पैसा अडका, सगळं काही आहे. पण तुला सांगू? माझं मन आता गेले काही दिवस मला अतिशय खात आहे. मी कोणालाही सांगू शकत नाही, बायकोलाही सांगितले नाही... अरे, आता मला रोज आयुष्य जगताना, बँक बॅलन्स बघताना, बायकोचे दागिने बघताना, मी आयुष्यभर ज्यांना ज्यांना लुटलं, ज्यांच्याकडून पैसे खाल्ले त्यांचे चेहरे उभे रहातायत. म्हणजे मी जेव्हा अगदी ज्युनियर असल्यापासून एका खेड्यातल्या गरीब बाईकडून साहेबांच्या सहीला पन्नास रुपये लागतील असं बोलून जिच्याकडून पैसे खाल्ले त्या बाईचा चेहराही उभा रहातो. मी जिथून जिथून पैसे खाल्ले, लोकांची अडवणूक केली आणि पैसा दिला नाही म्हणून कामं केली नाही ते सगळे मला दिसतात... माझा कॉन्शस मला खायला लागला आहे. मी झोपलो तरी मला आता मन शांत बसू देत नाही.... एका बाईने मला लाच म्हणून हजार रुपये दिले नाही. मी तिचं काम केले नाही ती बाई दिवसभर आमच्या ऑफिसबाहेर झाडाखाली हतबलपणे बसून होती ते आठवतं, तेव्हा काही वाटलं नव्हतं, पण आता मला कमालीची बेचैनी येते. तिचा हतबल म्लान चेहरा आठवतो. अत्यंत लबाडीने आणि साळसूदपणे लोकांना लुबाडून केलेल्या खरेद्या आठवतात. गोरगरिबांना लुटून मी युरोपवारी केली त्याचा गिल्ट मला आतून कुरतडतो आहे...
      सगळं मजेत चाललंय असं तुम्हाला जगाला दिसतंय ते तसंच दिसत रहाणार याची काळजी मी घेतोच आहे. पण परवा मुलगा माझ्या सुनेसमोर मला म्हणाला, 'पपा तुम्ही गप बसा हो. तुम्हाला काय कळतंय?' माझा कचरा झाला तिच्यासमोर. पण पुन्हा हसरा रिलॅक्स मुखवटा घेऊन मी वॉकला बाहेर पडलो रे...
     वाल्या कोळ्यासारखी गत झाली आहे माझी. माझं आंतर्मन मला सांगतंय... आत्ता आनंदी मुखवटा घालून मी हसत खिदळत फिरतोय पण आतून पोखरत चाललो आहे मनाने. मला अन्नपाणी गोड लागत नाही. मी अबोल होत चाललो आहे. हरिद्वारला जाऊन गंगास्नान पण करुन आलो.... काय जे मनात येईल ते करतो. अन्नदान करतो, होमहवन करतो पण मला आतून माहित आहे... हे डाग निघणार नाहीत. मी आतल्या आत कोंडून मरणार आहे सचिन....”
     मी पत्रिकेवर नजर टाकली. शनि महादशा सुरु होऊन जेमतेम सहा महिनेच झाले होते. शनि महाराजांचा अंमल सुरु झाल्यावर देवांचे देव महादेवही जिथे वरमले आणि हत्तीचं रुप घेऊन जंगलात लपले तिथे असल्या छाटछूट रावसाहेब आणि तात्यालोकांची काय अवस्था होणार? आजही ते गृहस्थ दिसतात... नजरेतला भकासपणा आणि एकटेपणा आताशा जास्त गडद होत चालला आहे... बाकी सगळं छान सुरु आहे!!!

              ©® सचिन मधुकर परांजपे
                    पालघर.
(आवडल्यास सामायिक करतांना लघुकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.)
     आजची ही कथा *माजी वायुसैनिक श्री. चंद्रशेखर धुमाळ, हैदराबाद* यांच्या सौजन्याने.
_*C/P.*_

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...